वांगण बारीत दरड कोसळली,चालकाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
उंबरठाण : गंगाराम गावित
मागील 3 दिवसांपासून अतिवृष्टी मुळे सुरगाणा तालुक्यात सतत धार चालू असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला,मात्र एकीकडे नुकसानीचे सत्र सूर आहे,तालुक्यातील नद्यांना भरपूर प्रमाणात पावसाच्या पाण्यामुळे पूर आलेला आहे त्यात बऱ्याच शेतकऱ्यांचे लावणीला आलेले भाताचे रोप वाहून घेतले गेले ,त्यातच आज रविवार रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास उंबरठान जवळ असलेली वांगण बारीतील दरड कोसळली त्यामुळे पूर्ण डोंगर खचून रस्त्यावर पूर्ण चिखल व मोठ मोठे दगड,झाडे पडल्याने रस्त्यावर वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे ,सुदैवाने सकाळची वेळ असल्याने रस्त्यावर जास्त वाहतूक नसल्याने जीवितहानी टळली मात्र सकाळी बर्डीपाडा ते नाशिक जाणारी महामंडळाची बस बारीत येताच दरड कोसळली मात्र चालकाच्या सावधगिरीमुळे कोणतीही हानी झालेली नाही ,मात्र दरवर्षी ह्या बारीत दरड कोसळत असते त्यामुळे स्थानिक प्रशासनाने थोडी दखल घ्यावी अशी मागणी होत आहे,
भावानेच केले बहिणीच्या प्रियकरावर धारदार कोयत्याने वार सिडको विशेष प्रतिनिधी :-पाटील नगरातील पेठे शाळेसमोर मंगळवारी…
टायर फुटल्याने बिंग फुटले सिन्नर : प्रतिनिधी समृद्धी महामार्गावरून वैजापूर येथून मुंबईकडे निघालेल्या एका कारचे…
आता जनावरांची वाहतूक होणार सुरक्षित सिडको विशेष प्रतिनिधी -भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान (DST) आणि…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मोहदरी - चिंचोली परिसरातील वन विभागाच्या डोंगराला अज्ञात कारणास्तव लागलेल्या आगीत…
आपल्या लाडक्या लहान बहिणीच्या लग्नासाठी मेहनत करुन जतन करून ठेवलेली सुमारे पावणे दोन लाख रुपयांची…
नाशिक : प्रतिनिधी आदिवासी विकास विभागाकडून आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना सामाजिक-भावनिक शिक्षण देण्यासाठी स्लॅम आउट लाउड आणि…
View Comments
Thanks