कधी कधी खूप थकवा आलाच तर दोन-चार डोके भेटायचे, गप्पाटप्पा, थट्टामस्करी, मद्यपान करत श्रमपरिहार करायचे. दुसऱ्या दिवशी पुन्हा आपापल्या कामात तल्लीन व्हायचे. मंगळ गृहाच्या अगदी विपरीत वातावरण इथे असे. ना करमणूक, ना मौजमस्ती, ना साजशृंगार, ना ही कामाव्यतिरित कुठल्या गोष्टीत रस असायचा. असे काही करणे म्हणजे वेळ वाया घालवणे अशी समज ठेवणाऱ्या सर्व पुरुषांचे जीवन जगणे सुरू होते.
इकडे मंगळ ग्रहावर सर्वच महिला होत्या. तिथलं वातावरण खूपच छान होतं. तिथला निसर्गही खूप सजलेला होता. मुबलक पाणी, झाडी, बागबगीचे, रंगबिरंगी फुलं, त्याभोवती उडणारे फुलपाखरे, पक्षी तर वावरणारे प्राणी सर्वकाही खूप मनमोहक होते. त्या सर्व निसर्गाची योग्य काळजी घेणाऱ्या आणि त्याचा आस्वाद घेणाऱ्या स्त्रिया, असे खूप छानसे वातावरण त्या मंगळ ग्रहावर असे.
त्या स्त्रियाची दिनचर्याही खूप मजेशीर असायची. रोज एकमेकींना भेटणार, खूप खूप गप्पा मारणार, खेळ खेळणार, गम्मत करणार, थट्टा मस्करी करणार. एव्हढंच नव्हे तर नेहमी भेटल्या की गाणी गाणार, नाचणार, खेळ खेळणार, चुटकुले, चारोळ्या, कविता करणार, असे मजेशीर वातावरणात वावरणाऱ्या त्या सर्व स्त्रिया. रोज स्वतःचा साज शृंगार करणार, नटणे थटणे तर खूप आवडायचे. केशभूषा, वेशभूषा, रंगबिरंगी पोशाख परिधान करणे, मेहंदी काढणे, केश रंगविणे, विविध आभूषणांनी स्वतःला सजविणे त्यांना आवडे. त्यांच्या भोवताली स्वच्छता ठेवणे, सजावट करणे, रांगोळी, फुलमाळांनी सुशोभीकरण करणे असे सगळेच नीटनेटके असे.
बाजारात जाणे, खरेदी करणे, खानपान करणे, नवनवीन पदार्थ बनविणे व त्या गोष्टींचा आस्वाद घेण्यासाठी वेळ खर्च करणाऱ्या सर्व त्या स्त्रिया. प्रसंगी सगळ्या जणी मिळून सण साजरे करणार, त्यानिमित्ताने भेटून खूप खूप गप्पा मारणार, स्वतःला मनसोक्तपणे व्यक्त करणाऱ्या त्या सगळ्या स्त्रिया मंगळ ग्रूहावर अगदी आनंदी, आणि खेळीमेळीच्या वातावरणात जगत होत्या.
चौकस आणि कुतूहल असे ठायी स्वभाव असणाऱ्या स्त्रियांपैकी एक स्त्री असेच दुर्बिणीने आकाशाची टेहळणी करत असताना तिला शुक्र गृह दिसला. त्यावर काहीसे आपल्यासारखे दिसणारे प्राणी दिसले. ही बातमी मंगळावर वाऱ्यासारखी पसरली. त्या गृहाची खबर घेण्यासाठी जावे असे ठरले. सर्व स्त्रिया मंगळ गृह सोडून शुक्रावर आल्या. पुरुषांना भेटून त्यांना छान वाटले. त्यांचे कौतुक वाटे, कामात मदत करू लागल्या. विचारपूस करत त्यांची काळजी घेऊ लागल्या.
काहीतरी वेगळे घडते आहे, नवीन सोबती मिळाला म्हणून पुरुषांनाही त्यांची सांगत आवडायला लागली. यात अनेक वर्षे गेली. चंचल आणि चौकस वृत्तीने एका स्त्रीने पृथ्वीचा शोध लावला. ठरले की आता आपण सर्वांनी पृथ्वीवर जायचे. असे करत सर्वच स्त्रिया आणि पुरुष मंडळींचे या पृथ्वी ग्रूहावर आगमन झाले. ते दोघे एकमेकांत रमू लागले, वावरू लागले. पृथ्वीवरील निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेऊ लागले.
बागबगीच्यांत, समुद्र किनारी, एकांतात भेटू लागले. एकमेकांच्या संगतीचा आनंद घेत ते कधी प्रेमात पडले ते कळलेच नाही. एकमेकांची काळजी घेतली, सुख दुःख, चांगल्या वाईट गोष्टी शेअर केल्या. आणि सर्वांनी ठरवले की आता आपण कायस्वरूपी या पृथ्वीतलावरच रहायचे. अशा पद्धतीने आपण इथे एकत्र राहतो आहे.
View Comments
लेख अतिशय सुंदर व उपयुक्त आहे .