लासलगाव रोडवर अपघातात मनमाडच्या दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

लासलगाव रोडवर अपघातात मनमाडच्या दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू
मनमाड : प्रतिनिधी

– मनमाड लासलगाव रोडवर रायपूर येथे खंडेराव मंदिराजवळ मोटरसायकल व इको गाडीचा समोरासमोर अपघात होऊन मनमाडच्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी दुर्घटना घडली आहे अपघात झाल्यानंतर रायपूरचे पोलीस पाटील साहेबराव नारळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले दोन्ही तरुणांना मनमाड उपजिल्हा रुग्णालयात आणले प्रथमोपचार करून त्यांना मालेगाव येथे अधिक उपचारासाठी नेत असताना रस्त्याचा त्यांची प्राणज्योत मालवली या घटनेमुळे शहरावर शोक काळा पसरली आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की मनमाड शहरातील गौतम नगर येथील रहिवासी पवन विनोद जाधव वय वर्ष 20 तर त्याचा मित्र बोरकरवाडी येथील रहिवासी योगेश पद्माकर अडांगळे वय 21 हे दोघे मोटरसायकल क्रमांक एम एच 15 बी ए 82 86 या गाडीने लासलगाव मार्गे विंचूर कडे निघाले होते याच वेळी रायपूर येथील खंडेराव महाराज मंदिराजवळील वळणावर समोरून येणारी इको गाडी क्रमांक एम एच 19 डी व्ही 73 94 या गाडीसोबत समोरासमोर धडक झाली या धडके पवन व त्याचा मित्र योगेश हे दोघे गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच रायपूर येथील पोलीस पाटील साहेबराव नारळे यांनी घटनास्थळी जाऊन मदत कार्य सुरू केले दोन्ही तरुणांना मनमाड उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले यावेळी त्यांच्यावर प्रथम उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी मालेगाव येथे नेण्यात आले मात्र मालेगाव कडे जात असताना अर्ध्या रस्त्यातच दोघांची प्राणज्योत मालवली या घटनेची माहिती मिळतात मनमाड शहरावर शोक कळा पसरली आहे या अपघाताची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहे

मनमाड लासलगाव महामार्गाची रुंदी वाढवावी
शहरात सर्वत्र झपाट्याने महामार्गांची वाढ होत आहे यात अनेक दुर्गती महामार्ग चार पदरी करण्यात आली आहे मात्र मनमाड लासलगाव हा महामार्ग अजूनही एकेरीच आहे या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढली आहे यामुळे मनमाड ते लासलगाव दरम्यान रोज छोटे-मोठे अपघात होऊन अनेक जण जखमी होत आहे यामुळे मनमाड ते लासलगाव या महामार्गाची रुंदी वाढवण्याची आवश्यकता असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

2 hours ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

2 hours ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

2 hours ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

3 hours ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

3 hours ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

3 hours ago