दिवसा वीजपुरवठ्याची शेतकर्यांची मागणी
नामपूर : वार्ताहर
अंबासन (ता. बागलाण) येथील सारदे शिवारातील शेतकरी विलास वामन कोर यांच्या शेतातील वीजपंपाच्या पेटीत विषारी नाग अडकल्याची घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास उघड झाली.
मोसम खोर्यात रब्बी हंगामाची जोरदार तयारी सुरू असून, कांदा लागवड, गहू, हरभर्याला पाणी भरणे चालू आहे. नामपूर परिसरात शेतीला रात्री अकरापासून तर पहाटे सहापर्यंत वीज असते. पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी बांधव दररोज रात्री अकराला वीजपंप चालू करण्यासाठी वीजपेटी जवळ जातात. अंबासन येथील शेतकरी विलास कोर सोमवारी अकराला जेव्हा आपला वीजपंप चालू करण्यासाठी पेटीजवळ गेले असता त्यांना भयंकर नऊ फुटांचा नाग पेटीत अडकल्याचे दिसले.
सुदैवाने त्याचे डोके पेटीत अडकल्यामुळे शेतकर्याला डंख मारता आला नाही. यावेळी आजूबाजूला आरडाओरडा करूनही कोणी न आल्यामुळे दुसर्या दिवशी पहाटे पेटीतून नागाला बाहेर काढण्यात आले. शेतीला दिवसा वीज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे. मात्र, वीज कंपनीचे अधिकारी याबाबत काहीच भूमिका घेत नसल्याची संतप्त भावना शेतकर्यांनी व्यक्त केल्या. शेतकर्यांचे मरण हेच सरकारचे धोरण असल्याचे टीका शेतकरी संघटनेचे पदाधिकारी प्रवीण अहिरे, अंताजी कोर, विठ्ठल महाजन, राजीव सावंत, बबलू सावंत, बिपिन सावंत, त्र्यंबक खैरनार यांनी केली आहे.
रात्री पिकांना पाणी देताना शेतकरी बांधवांची मोठी कसरत होत आहे. अंबासनच्या सौरऊर्जा प्रकल्पातून नामपूर सबस्टेशनला वीज आणण्याबाबत पुढील कार्यवाही सुरू असून, अजून आठ दिवसांत याबाबत अंतिम तोडगा निघेल. शेतकर्यांनी काही दिवस संयम ठेवावा.
-भूषण जगताप, उपमुख्य कार्यकारी अभियंता, नामपूर
Venomous snake found in electrical box in Ambasan
- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…
- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…
ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…
आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…
पंचवीस वर्षांपासून शेतकर्यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…