नाशिक

शिवभोजन केंद्रे आजपासून बंद होणार?

सरकारची गरिबांच्या उपाशी पोटावर लाथ

मुंबई :
राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकराने राज्यातील गरीब लोक आणि कामगारांसाठी शिवभोजन थाळी केंद्रे सुरू केली होती. गरिबांना परवडेल अशी पाच आणि दहा रुपयांत ही शिवभोजन थाळी केंद्रे चालवली जात होती. पण आता हीच शिवभोजन थाळी केंद्रे आता संकटात सापडली आहेत. राज्य सरकारने ही शिवभोजन थाळी केंद्रे बंद कऱण्याचा निर्णय घेतला आहे. मार्च 2025 पासून शिवभोजन थाळी केंद्रांना अनुदान मिळालेले नाही, वाढत्या आर्थिक अडचणींमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील शिवभोजन थाळी केंद्रचालकांनी ‘शिवभोजन थाळी केंद्र’ बंद करण्याचा इशारा दिला आहे. काहींनी 1 सप्टेंबरपासून थाळी बंद करण्याची घोषणा केली आहे.
गेल्या काही वर्षांत गॅस, डाळी, तेल, भाज्या आणि विजेच्या किमती वाढल्यामुळे केंद्र चालवणे आणखी कठीण झाले आहे. चालक संकटात आहेत. किरकोळ विक्रेतेही आता उधारीवर साहित्य देण्यास नकार देत आहेत. कर्मचार्‍यांना पगार देणे, भाडे देणे आणि इतर आवश्यक खर्च करणे कठीण झाले आहे. योजना सुरू होऊन पाच वर्षे झाली आहेत. महागाईमुळे खर्च झपाट्याने वाढला आहे. परंतु सरकारकडून मिळणार्‍या अनुदानाची रक्कम मात्र तेवढीच आहे. ज्यामुळे तूट वाढली आहे. अशा परिस्थितीत सहा महिने अनुदान बंद केल्यानंतर सरकार काय करू शकते? हा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी वितरित करण्यात आला
आहे. परंतु, त्याचवेळी गरजूंना आधार देणार्‍या शिवभोजन थाळी योजनेकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याची टीका होत आहे. राज्यातील लाखो नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला असून, दिवसभरात परवडणार्‍या दरात जेवण मिळत असल्याने गरिबांना दिलासा मिळतो. मात्र, ही योजना केवळ दिवसापुरतीच मर्यादित असल्याने रात्री उपाशी झोपावे लागते, अशी खंत लाभार्थ्यांनी व्यक्त केली आहे. 2019 मध्ये दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महाविकास आघाडीने राज्यात गरजू आणि गरीब कामगारांच्या पोषण आहारासाठी शिवभोजन थाळी केंद्र योजना सुरू केली.

Editorial Team

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

17 minutes ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

24 minutes ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

30 minutes ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

36 minutes ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

41 minutes ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

56 minutes ago