जागतिक आरोग्य संघटनेने यंदाच्या वर्षी आपली वसुंधरा, आपले आरोग्य ही संकल्पना पुरस्कृत केली गेली आहे. कोरोना कालावधीपासुन आरोग्य संदर्भात जनसामान्यांमध्ये जागरुकता निर्माण झाली आहे. निसर्गाने आयतेच उपलब्ध करुन दिलेले हवा, पाणी, पर्यावरण यांचा आरोग्याशी जवळचा संबंध आहे. सर्व गोष्टी स्वच्छ करण्यासाठी आपण पाण्याचा वापर करतो. पण, पाण्याच्या स्वच्छतेची जबाबदारीसाठी मात्र आपण स्थानिक स्वराज्य संस्थांकडे बघतो. दूषित पाण्यामुळे उलटी, जुलाब तसेच विषमज्वर कावीळ सारखे घातक आजार उद्भवतात. पाणी उकळुण पिणे सारख्या साध्या कृतीसोंबत शेवग्याच्या बीयांचा पाणी शुद्धीकरणातील वापर असे अनेकविध उपाय अंगीकार करता येतात. सामाजिक स्तरावर नदी, नाले व परिसर स्वच्छता हे दीर्घकालिन व तेवढेच महत्वाचे आहे. नाशिक शहरातून वाहणार्या नंदिनी, वाघाडी व इतर नाल्यांमध्ये सर्रास सोडलेले सांडपाणी, मलजल केवळ पाणीच प्रदुषित करत नसुन त्यावर अवलंबुन असलेली एकुणच इकोसिस्टिम बाधीत करत आहे. सजग नागरिक म्हणुन या प्रदुषणाला आळा घालणे हे देखील प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
– डॉ वैभव दातरंगे
सामाजिक आरोग्य सल्लागार सचिव, निमा नाशिक
हे ही वाचा :
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…