श्रीलंकेत उपासमार, भारताकडून तांदूळ

श्रीलंकेत उपासमार, गंभीर आर्थिक संकट
भारताकडून ४० हजार टन तांदळाची मदत

नवी दिल्ली:- आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या श्रीलंकेत उपासमार सुरू झाली असून, भारताने या देशाला तातडीची मदत म्हणून 40 हजार टन तांदूळ पाठविला आहे.
भारताच्या शेजारील श्रीलंकेत महागाईचा आगडोंब उसळला असून, गंभीर आर्थिक संकट उभे राहिले आहे. विदेशी चलनाचा साठा जवळपास संपुष्टात आला असून, हा देश इतर देशांच्या कर्जखाली दबला आहे. दिवाळखोरीच्या संकटातून बाहेर श्रीलंकेला बाहेर काढण्यासाठी अनेक देश पुढे आले आहेत. त्यात भारताची भूमिका सर्वात मोठी आहे. अन्न संकट
संपवण्यासाठी भारताने 40 हजार टन तांदूळ पाठवून दिलासा दिला आहे.
श्रीलंकेत प्रचंड महागाई वाढली असून, लोकांनी राष्ट्राध्यक्ष गोटबाया राजपक्षे यांच्या घराबाहेर आंदोलन सुरू केले आहे. राजपक्षे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. सरकारविरोधात संतापाची लाट निर्माण झाली आहे. लोकांनी रस्त्यांवर उतरुन आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे.
भीषण आर्थिक संकट आणि निदर्शने यामुळे देशभरात आणीबाणी लागू करण्यात आली असून, संचारबंदी जारी करण्यात आली आहे.
खाद्यपदार्थ इतके महाग झाले आहेत की, लोकांवर उपाशी झोपण्याची वेळ आली आहे. पेट्रोलपेक्षाही दूध महाग झाले आहे. एक कप चहाची किंमत 100 रुपये, तर मिरची 700 रुपये किलोने विकली जात आहे. बटाटे 200 रुपये किलाे झाले आहेत. वीजनिर्मितीवरही परिणाम झाला असून, अनेक शहरांमध्ये 12 ते 15 तास वीजपुरवठा खंडित होत आहे.

Ramesh Shejwal

Recent Posts

अधिक मासातील अधिक विचार

‘वर्षामागूनी वर्ष सरती ऋतू मागूनी ऋतू’ या गाण्याच्या ओळीप्रमाणे ऋतू चक्र फिरत असते. महिने, वर्ष…

15 minutes ago

मरण स्वस्त आणि जगणं महाग

अनेकांना वाटतं की, पेट्रोल-डिझेल महागलं की फक्त स्वतःची गाडी असणार्‍यांनाच फटका बसतो. पण हे अर्थशास्त्र…

34 minutes ago

खरंच!.. काय होते ते दिवस….

बालपण म्हणजे जणू सुंदर स्वप्न. जे जगताना कधी कळत नाही, पण नंतर आठवलं की डोळे…

40 minutes ago

कायद्याच्या बालेकिल्ल्यात रिक्षाचालकांची मुजोरी

पोलिसांचा कानाडोळा; वाहतूक कोंडीत भर नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी मोहीम शहर…

49 minutes ago

जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र

109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…

58 minutes ago

अवकाळीचा नाशिक विभागाला सर्वाधिक फटका

1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…

1 hour ago