नाशिक

पार्किंगच्या समस्येमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात   

 

नाशिक : अश्‍विनी पांडे

शहरातील अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा  जुना आग्रा रोड  भागातील सीबीएस ते मेहेर या भागात वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. याभागात असलेल्या शाळांतील विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरुन रस्ता पार करावा लागत आहे.

सीबीएस परिसरात जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय,  विविध शासकिय कार्यालये व अनेक शाळा यांच्यामुळे नेहमीच वर्दळ असते. या रोडवर पार्किंगची भीषण समस्या निर्माण झाली आहे. विद्यार्थी,ज्येष्ठ नागरिक व महिला यांना जीव मुठीत धरून या ठिकाणाहून प्रवास  करावा लागत आहे  अनेक पालकांनी व विद्यार्थ्यांनी याबाबत वेळोवेळी तक्रारी केल्या असून त्यासाठी शालेय प्रशासनाने संबंधित विभागाकडे तक्रार नोंदवली आहे. मात्र केवळ प्रशासन आपल्या सोयीनुसार उत्तर देत असून त्यावर कुठलीही ठोस उपाययोजना करत नसल्यामुळे पालक’ विद्यार्थी व नागरिक त्रस्त झाले आहेत. शालेय  प्रशासनानेही वेळोवेळी कार्यालयांकडे तक्रार  केली आहे. या ठिकाणी  आदर्श माध्यमिक विद्यालय,डी डी बिटको बॉईज हायस्कूल, वाय डी बिटको बॉईज हायस्कूल, शासकीय कन्या शाळा  या अनेक शाळा असून तेथे विद्यार्थ्यांना रोजच येणे-जाणे करणे क्रमप्राप्त आहे. त्याचबरोबर विविध शासकीय कामांसाठी व जिल्हा न्यायालयात जिल्ह्यातून असंख्य नागरिक येत असतात त्यांनासुद्धा या समस्यांना तोंड द्यावे लागते. शाळांच्या समोर नो पार्किंग असूनही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चारचाकी व दुचाकी वाहनांची गर्दी पाहायला मिळते यामुळे विद्यार्थ्यांना रस्त्यातून शाळेत जाणे व रस्त्यावर येणे अत्यंत अडचणीचे झाले आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे त्याचबरोबर या ठिकाणी मुलींच्या शाळा असल्यामुळे या ठिकाणी अनेक गैरप्रकार वाढतांना दिसत आहेत. टवाळखोर मुलांची वर्दळ वाढली आहे. छेडछाडीच्या वेगवेगळ्या तक्रारीमध्ये वाढ होताना दिसत आहे , त्याचबरोबर काही शाळांच्या जवळच पोलीस व्हॅन न्यायालयात विविध कारणांसाठी  आरोपींना  आणले जाते. त्या व्हॅन शाळेच्या गेटजवळच नो पार्किंगमध्येच  उभ्या केल्या जातात. त्यामुळे  विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत असल्याची खंत व्यक्त करीत   पालकांनी शाळांकडे तक्रारी केल्या आहेत.

 

 

 

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

लैंगिक अत्याचार करणार्‍या दोघा फरार आरोपींना अटक

सातपूर : प्रतिनिधी पीडित तरुणीला जिवे मारण्याची धमकी देऊन मॅक्स कॅफे तसेच आई-वडील घरी नसताना…

2 minutes ago

प्रकाश लोंढेच्या जामीन अर्जावर 26 मेस सुनावणी

सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर येथील ऑरा बारमधील गोळीबार आणि खंडणी प्रकरणातील मुख्य संशयितांच्या अडचणी…

10 minutes ago

अंबडमध्ये कचराकुंडीत नवजात अर्भक फेकले, नागरिकांत संताप

सिडको : विशेष प्रतिनिधी अंबड गावातील एका शाळेजवळील कचराकुंडीत मृत अर्भक आढळल्याची धक्कादायक घटना मंगळवारी…

17 minutes ago

सुचितानगरला घरफोडीत 36 लाख लंपास

सिडको : विशेष प्रतिनिधी येथील सुचितानगर परिसरातील बंद फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी सोने, चांदी, हिर्‍यांचे…

22 minutes ago

लाच स्वीकारताना एकाच वेळी आठ जण रंगेहाथ ताब्यात

नाशिक: प्रतिनिधी सागाचे झाड तोडून त्याची विक्री करण्याची परवानगी देण्याच्या मोबदल्यात 11,500 रुपयांची लाच स्वीकारताना…

26 minutes ago

कत्तलीसाठी जाणारे वाहन पकडले

गुन्हेशोध पथकाची कामगिरी; 3 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त पंचवटी : प्रतिनिधी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर…

31 minutes ago