कुंभमेळ्यावर सावट, आखाडा परिषदेचे दोन गट आमनेसामने
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
बडा उदासीन आखाड्याच्या स्वयंघोषित पंचांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा दावा श्री महंत रघुमुनी महाराज यांनी केला आहे. 9 जुलै 2026 रोजी कांचीपुरम येथे झालेली बैठक बेकायदेशीर असून, बनावट प्रमुख महंत दुर्गादास यांनी हुकूमशाही पद्धतीने ही निवड केल्याचे रघुमुनी यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आश्रमांच्या व्यवहारांवर बंदी घातल्याने निराश होऊन दुर्गादास आखाड्याची लूट करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. याप्रकरणी न्यायालय आणि अखिल भारतीय आखाडा परिषद लवकरच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
या वादाचे पडसाद अखिल भारतीय आखाडा परिषदेमध्येही उमटले असून, दोन गटांतील संघर्ष विकोपाला गेला आहे. निरंजनी आखाड्याचे श्री महंत रवींद्र पुरी आणि महानिर्वाणी आखाड्याचे श्री महंत रवींद्र पुरी यांच्यात आखाडा परिषदेच्या अध्यक्षपदावरून वाद सुरू आहे. दोन्ही गट बडा उदासीन आखाडा आपल्याच सोबत असल्याचा दावा करत आहेत.
हरिद्वार येथील बैठकीत महानिर्वाणीच्या रवींद्र पुरी यांनी 13 पैकी 8 आखाडे सोबत असल्याचा दावा केला होता. त्याला प्रतिवाद म्हणून निरंजनी आखाड्याच्या गटाने त्र्यंबकेश्वर येथे बैठक घेऊन महंत रघुमुनी यांच्यावरील आरोप न्यायालयाने फेटाळल्याचे सांगत त्यांना व्यासपीठावर स्थान दिले. यानंतर संतप्त झालेल्या दुसर्या गटातील श्री महंत दुर्गादास यांनी कांचीपुरम येथे पंचांची बैठक घेऊन महंत रघुमुनी यांची आखाड्यातून हकालपट्टी केल्याची घोषणा केली.
आखाडा परिषदेतील या अंतर्गत वादामुळे आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यावर मोठे सावट निर्माण झाले आहे. हा वाद न मिटल्यास 1991 च्या कुंभमेळ्याप्रमाणे साधूंमध्ये परस्परसंघर्ष होऊन कुंभमेळा धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. शासनाने 35 हजार कोटी रुपये खर्चून नियोजित केलेल्या या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शासकीय पातळीवरून या वादाची गंभीर दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
तथाकथित बैठकीवर सर्व मंडलातील साधूंनी बहिष्कार टाकला होता. उच्च न्यायालयाने कार्यकारिणी रद्द केली आहे. त्यांना कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार नाही. न्यायालयाच्या आदेशाचा आणि आखड्याच्या नियमांचा अवमान करणार्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.
– श्री महंत रघुमुनी महाराज, श्री पंचायती बडा उदासीन आखाडा
A dispute has erupted in the Bada Udasin Akhada.
- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…
- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…
ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…
आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…
पंचवीस वर्षांपासून शेतकर्यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…