महाराष्ट्र

वर्षभरात देशातील सर्व टोलनाके बंद होणार

वर्षभरात देशातील सर्व टोलनाके बंद होणार

नवी दिल्ली :
पुढील एका वर्षात कुठेही टोल दिसणार नाहीत. त्याचप्रमाणे टोलच्या मोठ्या रांगेत उभे राहण्याचीदेखील गरज पडणार नाही. यासाठी केंद्र सरकार एका विशेष प्रणालीवर काम करत आहे. ही प्रणाली देशभरात लागू झाल्यानंतर कोणत्याही वाहनाला टोल बूथवर पैसे भरण्यासाठी लांबच लांब रांगेत उभे राहण्याची गरज पडणार नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या योजनेबाबत लोकसभेत मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, पुढच्या वर्षभरात टोल वसुलीची प्रणाली संपूर्ण बदलली जाईल. आता टोल हा फक्त इलेक्ट्रॉनिक प्रणालीद्वारे स्वीकारला जाणार आहे. याचा वाहनचालकांना मोठा फायदा होणार आहे.
हिवाळी अधिवेशनात बोलताना गडकरी म्हणाले की, नवीन प्रणाली 10 ठिकाणांहून सुरू करण्यात आली आहे आणि पुढील एका वर्षात ती संपूर्ण देशात विस्तारीत केली जाईल. यामुळे सध्याची टोल व्यवस्था पूर्णपणे बंद होईल, असे ते म्हणाले. टोलच्या नावाखाली कोणीही रोखणार नाही. एका वर्षाच्या आत, ‘इलेक्ट्रॉनिक टोल वसुली’ देशभरात लागू केली जाईल. गडकरी म्हणाले की, सध्या देशभरात 10 लाख कोटी रुपयांचे 4500 महामार्ग प्रकल्प सुरू आहेत.
नॅशनल पेमेंट्स
कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक टोल वसुली कार्यक्रम विकसित केला आहे. यावर्षी ऑक्टोबरमध्ये केंद्र सरकारने फास्टॅग नसलेल्या वाहनचालकांना मोठा दिलासा दिला. या सवलतीअंतर्गत, जर एखाद्या वाहनाकडे फास्टॅग नसेल किंवा ते काम करत नसेल तर टोल प्लाझावर दुप्पट रोख कर देण्याऐवजी त्याला टोल टॅक्सच्या केवळ 1.25 पट रक्कम भरावी लागेल. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने यासंदर्भात अधिसूचना जारी
केली आहे.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिंहस्थात स्वयंसेवी संस्थांचे योगदान

- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…

19 hours ago

सिंहस्थानंतरही नाशिकच्या विकासाला चालना मिळणार : शेखर सिंह

- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…

20 hours ago

अफगाणिस्तानमधील 25 लाख मुली शिक्षणाविना!

ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…

20 hours ago

सुपर पॉवर सीएम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…

20 hours ago

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या 2,421 पदांसाठी मेगाभरती

आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…

20 hours ago

भूसंपादनावरून महासभा गाजली

पंचवीस वर्षांपासून शेतकर्‍यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…

21 hours ago