आता जनावरांची वाहतूक होणार सुरक्षित

आता जनावरांची वाहतूक होणार सुरक्षित
सिडको विशेष प्रतिनिधी
-भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान (DST) आणि त्यातील SEED विभागा मार्फत नवीन तंत्रज्ञान विकासनाचे मोलाचे कार्य केले जाते, ज्यात ग्रामीण भागातील जीवनमान उंचावण्यासाठी विविध संशोधन तसेच विविध लोक उपयोगी तंत्रज्ञान विकसित करण्यासंदर्भात विशेष प्रयत्न केले जातात. त्याच संशोधनाचा एक भाग म्हणून भारतातील जनावरांना ने आण करण्यात होणाऱ्या इजा आणि त्रासाचा विचार करून, उपलब्ध गाड्यांवर बसवता येणारे, कमी खर्चिक, चढ उतरण्यास सोपे असा पिंजरा जोडणी आणि दरवाजा (रॅम्प) गुरु गोबिंद सिंग इंजिनिअरिंग कॉलेज चे प्राध्यापक संदीप पाटील यांनी त्यांच्या संशोधन अभ्यासात तयार केला. ज्याचा उपयोग हा नक्कीच पुढील काळातील जनावरांच्या संरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने इतर वाहनावर जोडण्यासाठी होईल.
भारतात गुरांची वाहतूक प्रामुख्याने सामान्य मालवाहू वाहनांवर केली जाते, ज्यामध्ये गुरांना गाडीत चढवणे आणि उतरवणे (लोडिंग आणि अनलोडिंगसाठी) कोणतेही विशेष बदल केलेले नसतात. या साठी बाजार समितीत किव्हा गौशाळेत एखाद्या बांधलेल्या चौथऱ्याचा वापर करताना दिसतात, मात्र, अश्या गाडयांना शेतांमध्ये किंवा रस्त्याच्या आपत्कालीन परिस्थितींमध्ये मोठी अडचण ठरते, ज्यामुळे प्राण्यांना तणाव आणि संभाव्य दुखापती होऊ शकतात. या प्रकल्प अभ्यासाचा(प्रोजेक्टचा) उद्देश भारतातील शेतकरी आणि वाहतूकदारांच्या गरजे नुसार आणि गाडीच्या आकारा नुसार उभारू शकणारे (मॉड्युलर) आणि लवचिक पिंजरे(केज) तयार करणे आहे. यात गुरांच्या वाहतूकि साठी उघड झाप होऊ शकणारे आणि उतार असलेला दरवाज्याची (अडजस्टेबल रॅम्प) जोडणी करण्यात आली आहे, जे गुरांना गाडीत चढवण्याचा मार्ग (लोडिंग प्लॅटफॉर्म) म्हणून कार्य करते आणि वाहनासाठी सुरक्षित सुरक्षा दरवाजा म्हणूनही वापरले जाऊ शकते. समन्व्ययांकानी आपल्या वडिलांप्रतीच्या कृतज्ञतेतून ह्या पहिल्या प्रयत्नास “सुभाष गौसेवा वाहन” असे नाव दिले.
गुरुगोविंद सिंग अभियांत्रीकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नीलकंठ निकम यांनी ह्या प्रक्लपातील विशेष बाबींचा उल्लेख करून समन्वयक प्रा. संदीप पाटील यांचे कौतुक केले आणि पुढील संशोधनास प्रेरणा दिली. गुरुगोविंद सिंग फाउंडेशनचे अध्यक्ष सरदार बलबीरसिंग छाब्रा, उपाध्यक्ष हर्जित आनंद, सचिव स. कुलजितसिंग बिर्दी आणि सर्व कार्यकारी सभासद यांनी ह्या प्रकल्पाची प्रात्यक्षिकरित्या माहिती घेऊन असे प्रकल्प आणि संशोधन पुढे चालावे या करता प्रोत्साहित केले. हा प्रकल्प यशस्वीपने पूर्ण करताना होणाऱ्या सह्कार्या बद्दल समन्वयक पाटील यांनी फौंडेशनचे सर्व सभासद, प्राचार्य  डॉ निकम , सर्व कर्मचारी आणि शिक्षकांचे आभार मानले.
Editorial Team

Recent Posts

अधिक मासातील अधिक विचार

‘वर्षामागूनी वर्ष सरती ऋतू मागूनी ऋतू’ या गाण्याच्या ओळीप्रमाणे ऋतू चक्र फिरत असते. महिने, वर्ष…

23 minutes ago

मरण स्वस्त आणि जगणं महाग

अनेकांना वाटतं की, पेट्रोल-डिझेल महागलं की फक्त स्वतःची गाडी असणार्‍यांनाच फटका बसतो. पण हे अर्थशास्त्र…

42 minutes ago

खरंच!.. काय होते ते दिवस….

बालपण म्हणजे जणू सुंदर स्वप्न. जे जगताना कधी कळत नाही, पण नंतर आठवलं की डोळे…

48 minutes ago

कायद्याच्या बालेकिल्ल्यात रिक्षाचालकांची मुजोरी

पोलिसांचा कानाडोळा; वाहतूक कोंडीत भर नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी मोहीम शहर…

58 minutes ago

जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र

109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…

1 hour ago

अवकाळीचा नाशिक विभागाला सर्वाधिक फटका

1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…

1 hour ago