राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय

सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खाऊ घालण्यावर बंदी

नसबंदी हाच उपाय; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

नवी दिल्ली :
सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (दि. 22 ऑगस्ट) रोजी भटक्या कुत्र्यांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या प्रकरणाची सुनावणी करताना तीन न्यायमूर्तींच्या विशेष खंडपीठाने सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना नोटिसा बजावल्या आहेत. न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की, शेल्टर होममध्ये ठेवण्यात आलेले सर्व कुत्रे सोडण्यात यावेत. मात्र, जे कुत्रे आजारी किंवा आक्रमक स्वभावाचे आहेत, त्यांना सोडले जाऊ नये.
सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने पुढे सांगितले की, सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खाऊ घालण्यावर बंदी लागू राहील. यासाठी स्वतंत्र आणि निश्चित ठिकाणं ठरवली जातील. जर ठरवलेल्या ठिकाणाच्या बाहेर कुणीही कुत्र्यांना खाऊ घातले तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. सुनावणीदरम्यान न्यायालयाने हेही नमूद केले की, भटक्या कुत्र्यांची नसबंदी करून त्यांना त्वरित सोडण्यात यावे. न्यायालयाच्या मते, सार्वजनिक ठिकाणी अन्न देण्याच्या प्रकारामुळे अनेक दुर्घटना घडल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने 11 ऑगस्टच्या आदेशात सुधारणा करत स्पष्ट केले आहे की, भटक्या कुत्र्यांना नसबंदी व लसीकरण केल्यानंतर त्याच परिसरात पुन्हा सोडण्यात यावे. फक्त जे कुत्रे रेबीजने संक्रमित आहेत किंवा आक्रमक वर्तन करतात त्यांना शेल्टर होममध्येच ठेवावे. कोर्टाने सांगितले की, हा नियम संपूर्ण देशभर लागू राहणार आहे. याआधी सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीत व दिल्ली-एनसीआर परिसरातील रस्त्यांवरून भटके कुत्रे हटवून त्यांना कायमस्वरूपी शेल्टर होममध्ये ठेवण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणाची सुनावणी तीन न्यायमूर्तींच्या विशेष खंडपीठाकडून झाली. यात न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारियांचा समावेश आहे.

 

 

Editorial Team

Recent Posts

मोहाडीत मोहाडमल्ल महाराजांची शतकाची रोठ परंपरा

लोकसहभागातून साडेतीन लाखांचा रथ; आज भव्य मिरवणूक दिंडोरी : प्रतिनिधी तालुक्यातील मोहाडी येथील ग्रामदैवत श्री…

18 hours ago

सिंहस्थाच्या नावाने त्र्यंबकेश्वरचे रस्ते गाळात

ओव्हर स्मार्ट नियोजनामुळे नागरिक अन् भाविक हैराण त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर…

18 hours ago

पावसा पावसा… तू पण!

नाशिक शहर आणि सभोवतालच्या परिसरात मागील महिन्याभरात धो..धो.. पाऊस बरसला आहे. नाशिक जिल्ह्यात जुलै महिन्यात…

19 hours ago

अब्दुल्लांचे आंदोलन

कॉक्रोच जनता पार्टीच्या ‘चलो संसद’ आंदोलनात 20 जुलै रोजी प्रचंड हंगामा झाला. विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी…

19 hours ago

जीवघेणे खड्डे !

पाच जणांचा मृत्यू; नागरिकांमध्ये प्रचंड संताप नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्वर्र्भूमीवर शहरात हजारो कोटी…

19 hours ago

खड्डेमुक्तीसाठी मंत्री महाजनांचा सात दिवसांचा अल्टिमेटम

अन्यथा अधिकार्‍यांवर कारवाई, ठेकेदारही रडारवर नाशिक : प्रतिनिधी वर्षभरात सिंहस्थ कुंभमेळा होत असल्याने शहरात रस्ते…

19 hours ago