मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी भुजबळांना दिली महापुरुषांची पुस्तके भेट

मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी भुजबळांना दिली महापुरुषांची पुस्तके भेट

लासलगाव:समीर पठाण

लासलगाव येथील मराठा समाजाच्या तीन प्रमुख कार्यकर्त्यांनी ना छगन भुजबळ यांना महात्मा जोतिबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तके पाठवली असून भुजबळ यांनी या पुस्तकांचे वाचन करत या महापुरुषांचे विचाराचे अनुकरण करण्याची मागणी केली आहे

मराठा कुणबी ओबीसी वादामुळे ओबीसी नेते,राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ आणि मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांच्यात सुरू असलेल्या वार,पलटवारामुळे राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघालेला असताना आता भुजबळांचा मतदारसंघ असलेल्या येवला-लासलगाव मतदार संघातील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी छगन भुजबळांना डिवचले आहे.

महात्मा जोतिबा फुले,राजर्षी शाहू आणि डॉ बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारापासून मंत्री छगन भुजबळांना यांच्या विचारांचा विसर पडल्याने भुजबळ आज खालच्या पातळीवर जाऊन मराठा समाजावर टीका करत आहे त्यामुळे आम्ही त्यांना ही पुस्तके भारतीय पोस्ट डाक विभागामार्फत पाठवली असून या पुस्तकांचे भुजबळांनी वाचन करत महात्मा फुले,राजर्षी शाहू आणि डॉ आंबेडकर यांच्या विचारांचे अनुकरण करावे अशी मागणी केली असून भुजबळांनी पुस्तके वाचले किंवा नाही वाचली हे त्यांच्या भाषणातून कळेल आम्हाला कुरियरची पोच पावती नको असे यावेळी डॉ.सुजित गुंजाळ,प्रविण कदम,प्रमोद पाटील यांनी सांगून हे अनोखे आंदोलन केले आहे.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

अधिक मासातील अधिक विचार

‘वर्षामागूनी वर्ष सरती ऋतू मागूनी ऋतू’ या गाण्याच्या ओळीप्रमाणे ऋतू चक्र फिरत असते. महिने, वर्ष…

23 minutes ago

मरण स्वस्त आणि जगणं महाग

अनेकांना वाटतं की, पेट्रोल-डिझेल महागलं की फक्त स्वतःची गाडी असणार्‍यांनाच फटका बसतो. पण हे अर्थशास्त्र…

42 minutes ago

खरंच!.. काय होते ते दिवस….

बालपण म्हणजे जणू सुंदर स्वप्न. जे जगताना कधी कळत नाही, पण नंतर आठवलं की डोळे…

49 minutes ago

कायद्याच्या बालेकिल्ल्यात रिक्षाचालकांची मुजोरी

पोलिसांचा कानाडोळा; वाहतूक कोंडीत भर नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी मोहीम शहर…

58 minutes ago

जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र

109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…

1 hour ago

अवकाळीचा नाशिक विभागाला सर्वाधिक फटका

1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…

1 hour ago