उर्जा विषयात संशोधनाला मोठ्या संधी – दादा भुसे

उर्जा विषयात संशोधनाला मोठ्या संधी – दादा भुसे
म.वि.प्र. आणि एम.एन.इ.पी.ए.,मेडा यांचा संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळा व प्रदर्शनाचा समारोप
नाशिक ः प्रतिनिधी
विजेची कमतरता ही दिवसेंदिवस भासत असून नैसर्गिक ऊर्जास्रोत कधीतरी संपणार आहे.निसर्गाने दिलेल्या साधनसंपत्तीचा वापर मानव कल्याणासाठी केल्यास सकारात्मक परिणाम दिसतील. तसेच उर्जा विषयात संशोधनाला मोठा वाव असून तरुणांनी व विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन राज्याचे ,देशाचे भवितव्य बदलण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री व बंदरे आणि खनिजकर्म मंत्री दादा भुसे यांनी केले ते महाराष्ट्र नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी प्रोड्युसर्स असोसिएशन (एम.एन.इ.पी.ए.) मराठा विद्या प्रसारक समाज संस्था,महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट(एम.इ.डी.ए.),छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक समिती नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अपारंपरिक उर्जेची निर्मिती व वापर यावरील दोन दिवसीय कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी कर्म.बाबुराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयात बोलत होते. यावेळी माजी मंत्री विजय नवल पाटील, मविप्र संस्थेचे सभापती बाळासाहेब क्षिरसागर,कोंडाजीमामा आव्हाड, रवींद्र जगताप,मिलिंद पाटील,ओम देशमुख,भागवत बाबा बोरस्ते,विलास बोरस्ते ,समन्वयक उदय रकिबे,अनिल जाधव, शिक्षणाधिकारी डॉ डी डी लोखंडे, प्राचार्य डॉ एस आर देवने, प्राचार्य डॉ आय बी चव्हाण ,प्राचार्य ज्योती लांडगे आदी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी सभापती बाळासाहेब क्षिरसागर होते.
पुढे बोलतांना भुसे यांनी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीसमोर अवकाळी पाऊस,रोगराई यासारखी संकटे उभी राहिली असून शेतीमधून वीज निर्मिती करणारे मॉडेल विकसित करण्यासाठी प्रयत्न करावे तसेच नैसर्गिक उर्जेची उत्पादन किँमत जास्त असल्याने ती सर्वसामान्य माणसाला परवडतील अशी असावी,त्यासाठी शासनस्तरावरून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. सोलर उत्पादकांच्या मागण्या व ठराव शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी शक्य ती मदत केली जाईल व अपारंपरिक उर्जेच्या संदर्भात मविप्र संस्थेने घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांनी अभिनंदन केले.
अध्यक्षीय मनोगतात सभापती बाळासाहेब क्षिरसागर यांनी ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना सबसिडी वाढून मिळावी ,अपारंपरिक उर्जा वापराबाबत सकारात्मकतेने विचार करावा असे सांगितले.
प्रास्ताविकात विजय नवल पाटील यांनी अपारंपरिक उर्जेच्या संदर्भातील 24वे अधिवेशन भरविले असून उत्पादक,विक्रेते व सरकार यांच्यामधील दुवा म्हणून कार्य करणे हा उद्देश आहे. शासनाकडून सुरु असलेल्या कुसुम योजनेत सुधारणा करावी,नवीन उद्योजकांना अनुदान द्यावे व ज्यादा दराने सोलरवरील तयार वीज खरेदी करावी असे ठराव करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सूत्रसंचालन प्रा पंकज शेटे यांनी तर आभार डॉ अमोल काकडे यांनी मानले.

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

17 minutes ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

25 minutes ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

31 minutes ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

36 minutes ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

42 minutes ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

57 minutes ago