तत्पर बस चालकामुळे वाचले प्रवासी
लासलगांव प्रतिनिधी
लासलगाव आगारावरून सुटलेली लासलगाव – नाशिक सकाळी आठ वाजेची बस मंगळवारी हॉटेल मिरची औरंगाबाद रोड या ठिकाणाहून जात असताना अचानक बसचे ब्रेक फेल झाल्याने बस चालकाने दाखवलेल्या प्रसंगाधानाने जवळपास ७५ ते ८० प्रवाशी सुरक्षित बचावले.याच ब्लॅक स्पॉट वर मागील आठवड्यात झालेल्या अपघातात ११ प्रवाश्यांचा बळी गेला होता.ही घटना ताजी असतांना लासलगाव आगराच्या चालका ने दाखविलेल्या समयसूचकतेने दुर्घटना टळली
लासलगाव आगाराची नियमित धावणारी लासलगाव- नाशिक बस ही साडे नऊ वाजेच्या सुमारास जात असताना अचानक हॉटेल मिरची च्या जवळ बस चे ब्रेक फेल झाल्याने चालक पी व्ही भाबड यांनी प्रसंगावधान दाखवत बस नियंत्रित करत बस मधील जवळपास ७५ प्रवाश्यांना सुरक्षित पणे आडगाव नाका पर्यंत पोहचवले.यावेळी वाहक डी यु राठोड यांनीं सर्व प्रवाश्यांना दुसऱ्या बस मध्ये बसवत रवाना केले.चालक आणि वाहक या दोघांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळल्याने प्रवाश्यांकडून या दोघांचे आभार व्यक्त करण्यात आले.
लासलगांव आगारातील बसेसचा दर्जा हा अंत्यंत खालावलेला असून अनेक नादुरुस्त बस या रस्त्यावर चालत आहे.कोरोना पूर्वी लासलगाव बस आगारात ५६ बसेस या प्रवाश्यांच्या सेवेसाठी होत्या.मात्र आत्ता फक्त ३४ बसेस लासलगाव सेवेत आहेत.बस आगारकडून मागणी करूनही नवीन बसेस येत नसल्याने पालकमंत्री दादा भुसे यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…