शेतकर्यांची मागणी; नवीन खरेदीसाठी प्रस्ताव पाठवला
डांगसौंदाणे : प्रतिनिधी
डांगसौदाणे येथे आदिवासी विकास संस्थेमार्फत हमीभाव मका खरेदी केंद्र आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने सुरू केले आहे. शासनाने नोंदणी केलेल्या शेतकर्यांचा संपूर्ण मका खरेदी करावा, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.
येथील केंद्रावर आतापर्यंत 8,852 क्विंटल मका खरेदी केला. 574 शेतकर्यांनी 30,875 क्विंटलची नोंदणी केली आहे. सुमारे 2,205 हेक्टर क्षेत्रावरील मका नोंदणी झाली आहे. मका खरेदीची 25 हजार क्विंटलची मर्यादा आहे. आठ हजार 800 क्विंटल मका खरेदी केला आहे. आणखी पाच हजार क्विंटल खरेदीचे परवानगी असून, सात हजार क्विंटल नवीन खरेदीसाठी प्रस्ताव पाठवला आहे. परवानगी मिळाल्यानंतर पुढे पाच हजार क्विंटलचा नवीन प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती आदिवासी संस्थेचे सभापती गोकुळ जगताप, उपसभापती केदा बोरसे, सचिव जयवंत देशमुख व संचालकांनी दिली आहे.
मक्यास 2400 रुपये प्रतिक्विंटल भाव असल्याने शेतकर्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केंद्रावर गर्दी होत आहे. शेतकर्यांचे 120 ट्रॅक्टर खरेदी केंद्रावर उभे आहेत. शासनाने आदिवासी भाग असल्याने जास्तीत जास्त खरेदी करण्यासाठी मर्यादा वाढवून द्यावी, अशी मागणी होत आहे. पहिल्या टप्प्यातील शेतकर्यांचे पैसे खात्यात जमा झाल्याने शेतकरीवर्गात आनंद व्यक्त होत आहे. मार्केटमध्ये बाराशे ते सतराशे रुपयांनी मका खरेदी होतो.
याठिकाणी 2400 रुपयांनी मका खरेदी होत असल्याने शेतकर्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळत आहे. मका खरेदीसाठी साळवण, गुलमाळ, बारीपाडा, वाठोडा, तताणी, केळझर, भावनगर, करंजखेड, साकोडे, मोठे साकोडे, बुधाटे, वड्याचे पाढे, डांगसौदाणेे, पठावे, मोरकुरे, भिलदर, चाफापाडा, तळवाडे, किकवारी, जोरण, कपालेश्वर, चापापाडा, निकवेल, कंधाणे, तिळवण, निरपूर, चांधाणे, वटार आदी गावांतील शेतकर्यांनी मका नोंदणी केली आहे. खरेदी केलेला मका लवकर उचलून पुढील शेतकर्यांना मका खरेदीसाठी गोदाम मोकळे करून द्यावे, अशी मागणी 938 आदिवासी सहकारी संस्थांचे राज्याध्यक्ष कैलास बोरसे यांनी केली आहे.
Buy registered whole corn
सरकारकडे मासिक पाळी स्वच्छतेसाठी धोरण आहे, योजना आहेत, कागदोपत्री आकडे आहेत. पण या धोरणाची अंमलबजावणी…
नेपाळचे राजकारण गेल्या दोन दशकांपासून अस्थिरतेच्या भोवर्यात अडकलेले होते. राजेशाही संपल्यानंतर लोकशाहीची स्थापना झाली असली…
पश्चिम बंगाल, तामिळनाडूमधील मतदान तोंडावर आले असतानाच कोणताही संदर्भ नसताना केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात संसदेचे…
आजच्या डिजिटल युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हे तंत्रज्ञान वेगाने सर्व क्षेत्रांमध्ये प्रवेश करत आहे. शिक्षण…
रोजचं वर्तमानपत्र वाचलं, वृत्तवाहिन्या पाहिल्या तसेच समाजमाध्यमावर फेरफटका मारला तरी महाराष्ट्राच्या अब्रूचे धिंडवडे निघालेले दिसतील.…
संपलेल्या दहा दिवसांत समाजातील दोन प्रकार मी जवळून बघितले. एक प्रकार म्हणजे कोकणातून मजुरीसाठी आलेले,…