सत्तासंघर्षाची सुनावणी आता 11 जुलैला
नवीदिल्ली : अपात्रतेच्या नोटिसांबाबत सुप्रीम कोर्टात आज जोरदार युक्तीवाद करण्यात आल्यानंतर आता या प्रकरणाची सुनावणी 11 जुलैला होणार आहे. बंडखोर आमदारांना त्यामुळे म्हणणे मांडण्यास 11 जुलैपर्यंतचा वेळ मिळाल्याने त्यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी न्यायालयात जोरदार युक्तीवाद केल्यानंतर न्यायालयाने सर्व पक्षकारांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे. त्यासाठी पाच दिवसांची मुदत दिली असून, उपाध्यक्ष झिरवाळ यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. त्यंांनी अनधिकृत मेलवरुन आलेला अविश्वास कशामुळे नाकारला ? हे कोर्ट जाणून घेणार असून, त्यानंतरच यावर सुनावणी घेतली जाईल, न्यायालयाच्या या निर्णयामुळे मात्र बंडखोर आमदारांना 11 जुलैपर्यंत आता दिलासा मिळाला आहे.
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…