नाशिक : प्रतिनिधी
पावसाळ्यात नद्यांना येणारा पूर पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात . अशावेळी अनुचित घटना घडू नये यादृष्टीने होणाऱ्या गर्दीवर प्रतिबंध करावा . शहरी भागातील काझीगढी , सराफ बाजार , जुने व धोकादायक वाडे येथील नागरिकांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी नियोजन करणे आवश्यक आहे , असे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी बैठकीत सांगितले . पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांच्या सुरक्षेसाठी बचाव पथकांची गावनिहाय यादी तयार कराव्या . धरणविसर्गात नदीच्या पाणी पातळीत होणाऱ्या वाढीचा अंदाज घेण्यासाठी महानगरपालिका व जलसंपदा विभाग यांनी एकत्रितपणे पाणीपातळीचे मार्किंग नव्याने करून घ्यावे , असेही गमे यांनी सांगितले .
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…