गोदावरीला महापूर, वाहतूक ठप्प, वीटभट्ट्या पाण्याखाली, स्मशानभूमीत शिरले पाणी
निफाड : तालुका प्रतिनिधी
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. नांदूरमध्यमेश्वर धरणातून 55,778 क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आल्याने गोदावरी व कादवा नद्यांना पूर आला आहे. परिणामी, नांदूरमध्यमेश्वर, कोठुरे आणि रौळस येथील पुलांवर पाणी आल्याने राज्यमार्ग 27 वरील वाहतूक ठप्प
झाली आहे.
धरणातून बुधवारी 4,000 क्यूसेक, तर गुरुवारी सकाळी 46,227 आणि दुपारी 12 वाजता 55,778 क्यूसेकपर्यंत विसर्ग वाढवण्यात आला. नांदूरमध्यमेश्वर पुलाला अडकलेल्या पाणवेलींमुळे पाण्याचा फुगवटा तयार होऊन पाणी पुलावरून वाहू लागले. खबरदारीचा उपाय म्हणून निफाड व सायखेडा पोलिसांनी रस्ता बॅरिकेट्स लावून बंद केला. दुसरीकडे, सायखेडा येथे प्रशासनाने तत्परतेने पाणवेली काढल्याने तेथील पूल वाहतुकीसाठी खुला राहिला. पुराचे पाणी खानगाव थडी, मांजरगाव, चापडगाव, करंजगाव, कोठुरे, शिंगवे, काथरगाव, सायखेडा, गोंडेगाव व चांदोरी परिसरातील शेतात शिरल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच गोदाकाठावरील वीटभट्ट्या व कृषिपंप पाण्याखाली गेले असून, नांदूरमध्यमेश्वर येथील स्मशानभूमीतही पाणी शिरले आहे. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
Discharge of 55,778 cusecs from Nandur Madhmeshwar.
- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…
- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…
ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…
आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…
पंचवीस वर्षांपासून शेतकर्यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…