प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस गोडसे यांनी घेतली पंतप्रधान मोदी यांची भेट
नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
नाशिकरोड प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन नाशिकरोडची इंडिया सिक्युरिटी, करन्सी नोट प्रेस व कामगारांच्या समस्यांबाबत चर्चा केली. दोन्ही प्रेसमधील आधुनिकीकरण, उत्पादन, गुणवत्ता, कारखान्यांमधील सद्यस्थिती या सर्व गोष्टींची माहिती गोडसे यांनी पंतप्रधानांना दिली. पंतप्रधान मोदींनी नाशिकला येऊन प्रेस कामगारांशी संवाद साधावा, अशी विनंती गोडसे
यांनी केली.
या भेटीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार उपस्थित होते. त्यांच्या पुढाकारामुळे ही भेट शक्य झाल्याचे जगदीश गोडसे यांनी नमूद केले. अतिशय व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून मोदी यांनी इंडिया सिक्युरिटी प्रेस आणि करन्सी नोट प्रेस संबंधित सर्व बाबी बारकाईने ऐकून घेतल्या. कामगारांच्या भावना, प्रेसचा शंभर वर्षांचा गौरवशाली इतिहास आणि भविष्यातील वाटचाल याबाबत त्यांनी आस्थेने माहिती घेतली.
जेव्हा त्यांना सांगण्यात आले की, देशाच्या इतिहासातील पहिल्या कागदी चलनाच्या निर्मितीशी नाशिकच्या भूमीचा ऐतिहासिक संबंध आहे, तेव्हा त्यांनी विशेष आनंद व्यक्त केला. इंडिया सिक्युरिटी प्रेसने ई-पासपोर्टची छपाई यशस्वीपणे करून देशाच्या सेवेत दिलेल्या योगदानाचे पंतप्रधानांनी मनापासून कौतुक केले. हे कौतुक केवळ एका संस्थेचे नसून, ते हजारो कष्टकरी हातांचे, ज्यांनी आपल्या घामाने आणि मेहनतीने या संस्थेची प्रतिष्ठा उंचावली आहे त्यांचे आहे. कामगारांच्या श्रमाला जेव्हा देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाकडून दाद मिळते, तेव्हा तो क्षण प्रत्येक कामगारासाठी अभिमानाचा असतो, असे गोडसे यांनी नमूद केले.
गोडसे यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, देशाच्या
सर्वोच्च पदावर विराजमान असलेल्या व्यक्तीसमोर प्रेसचा, प्रेस कामगारांचा आणि नाशिकचा विषय मांडण्याची सुवर्णसंधी मिळणे ही निश्चितच मोठी जबाबदारी होती. पंतप्रधानांशी भेट हा माझ्या आयुष्यातील एक मोलाचा प्रसंग आहे. आपण ज्या संस्थेत काम करतो, ती केवळ एक सरकारी संस्था नाही; ती देशाच्या इतिहासाचा अविभाज्य भाग आहे. प्रेसचा गौरव, भवितव्य आणि येथील कष्टकरी कामगारांचे हित यासाठी आमचा संघर्ष आणि प्रयत्न यापुढेही सातत्याने सुरूच राहतील.
आमच्या पुढील लढ्याची ताकद
कामगारांच्या प्रश्नांवर सातत्याने मार्गदर्शन करणारे आणि गरजेच्या वेळी खंबीरपणे साथ देणारे नेतृत्व लाभणे ही आमच्यासाठी मोठी ताकद आहे. राजकारण हे केवळ सत्तेचे माध्यम नसते. ते समाजातील शेवटच्या घटकाचा आवाज सत्तेच्या केंद्रापर्यंत पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम असते. देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाशी थेट संवाद हीच आमच्या पुढील लढ्याची ताकद आहे.
Discussion regarding issues concerning India Security Press, Currency Note Press, and the workers.
- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…
- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…
ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…
आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…
पंचवीस वर्षांपासून शेतकर्यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…