महाराष्ट्र

दिवाळी फराळाला महागाईच्या झळा

 

बजेट कोलमडले : नागरिकांचे निघणार दिवाळं

नाशिक : प्रतिनिधी

दिवाळी हा नवचैतन्याचा सण  आाहे.. दिवाळीच्या महिनाभर आधीपासून दिवाळीची तयारी करण्यात येते. अबालवृध्दापासून सगळ्यांनाच दिवाळीच्या सणाची उत्सुकता असते. दिवाळीत तयार केल्या जाणार्‍या फराळी पदार्थाची उत्सुकता असते. मात्र यंंदा दिवाळीतील फराळी पदार्थालाही महागाईचा फटका बसला आहे.

दिवाळी फराळासाठी लागणारे चकली, चिवडा ,लाडू, करंजी,शंकरपाळे  पदार्थ केेले जातात. मात्र किराणाच्या दरात वाढ झाल्याने तयार फराळी पदार्थाच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे दिवाळीचा खुमासदार फराळ खाण्यासाठी महागाईचा झळा नागरिकांना सहन कराव्या लागणार आहेत.

पूर्वी दिवाळी फराळ बनवण्यासाठी घरातील सर्व महिला वर्ग एकत्र येत तयारी करत असत. आणि हितगुज साधत दिवाळी फराळाचे पदार्थ बनवत असत. पण काळ बदलला तसा महिलांही नोकरी करत असल्याने त्यांना ड्यूटीमुळे फराळ घरी बनवणे शक्य होत नाही.   त्यामुळे गेल्या काही वर्षात तयार फराळी पदार्थांना मागणी वाढली आहे. तयार फराळी पदार्थांना  वाढलेली मागणी लक्षात घेत अनेक बचत गटांकडून घरगुती फराळ विक्रीसाठी ठेवला आहे. यंदाही घरगुतीपध्द्ीने बनवलेल्या फराळी पदार्थाना मागणी वाढली आहे.

 

तयार फराळी पदार्थ            1 कि. किंमत

चकली                             320

भाजके पोहे चिवडा              300

करंजी                             600

अनारसे                           600

बेेसन लाडू                        600

गोड शंकरपाळे                  350

तिखट शंकरपाळे                320

अनारसे पीठ                     220

हेही वाचा : शिधापत्रिकाधारकांना सरकारचं दिवाळी पॅकेज

 

Vaishali gosavi

यंदा खाद्यतेलाच्या किंमती वाढल्याने तयार फराळच्या किंमतीही      30 टक्कयांनी वाढल्या आहेत. किंमती वाढल्या असल्या तरी यंदा ग्राहकांची तयारी फराळी पदार्थांना मागणी अधिक आहे.

वैशाली गोसावी,( घरगुती फराळी पदार्थाचे व्यावसायिक    )

हेही वाचा : आरोग्यदायी दिवा

 

 

 

 

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

17 minutes ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

25 minutes ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

31 minutes ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

36 minutes ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

42 minutes ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

57 minutes ago