नाशिक

जिल्ह्यातील 276 ग्रामपंचायतींचे होणार मूल्यमापन

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान
तालुकास्तरीय बाह्य समितीकडून मूल्यमापन सुरू

नाशिक : प्रतिनिधी

राज्याचे ग्रामविकास तथा पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार्‍या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी तालुकास्तरीय बाह्य समितीकडून मूल्यमापन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये हा तपासणी कार्यक्रम सुरू झाला असून, दि. 26 एप्रिल ते दि. 15 मे 2026 यात ग्रामपंचायतींची तपासणी होणार आहे.
या अभियानाचा उद्देश ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यक्षमता, पारदर्शकता, सेवा वितरणाची गुणवत्ता आणि विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी यांचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करणे हा आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायतींनी राबविलेल्या विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत कितपत पोहोचला आहे, याचाही सखोल आढावा घेण्यात येणार आहे.
सुधारित नियोजनानुसार बागलाण तालुक्यासाठी मंठा (जालना), चांदवडसाठी घनसावंगी (जालना), देवळ्यासाठी जालना, दिंडोरीसाठी जाफ्राबाद (जालना), इगतपुरीसाठी अंबरनाथ (ठाणे), कळवणसाठी परतूर (जालना), मालेगावसाठी गंगाखेड (परभणी), नांदगावसाठी पूर्णा (परभणी), नाशिक तालुक्यासाठी वाडा (पालघर), निफाडसाठी अंबड (जालना), पेठसाठी जव्हार (पालघर), सिन्नरसाठी बदनापूर (जालना), सुरगाण्यासाठी शहापूर (ठाणे), त्र्यंबकेश्वरसाठी विक्रमगड (पालघर) आणि येवला तालुक्यासाठी पालम (परभणी) या पंचायत समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या तपासणी अंतर्गत जिल्ह्यातील एकूण 276 ग्रामपंचायतींचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. समित्यांकडून शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार गुणांकन करण्यात येईल.
यामध्ये स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, शिक्षण, डिजिटल सेवा, ग्रामनिधीचा वापर, महिला व बालकल्याण उपक्रम, तसेच विविध केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची अंमलबजावणी यांचा समावेश असेल.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व संबंधित पंचायत समित्या, ग्रामपंचायती तसेच अधिकारी व कर्मचार्‍यांना या मूल्यमापन प्रक्रियेत सक्रिय सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामुळे ग्रामीण भागातील विकास प्रक्रियेला गती मिळाली असून, ग्रामपंचायतींमध्ये स्पर्धात्मकता वाढून उत्तम कामगिरीस प्रोत्साहन मिळाले असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे यांनी दिली.

जिल्ह्यातील सर्व 15 तालुक्यांमध्ये तपासणी

नाशिक जिल्ह्यातील सर्व 15 तालुक्यांमध्ये बाह्य तालुकास्तरीय समितीमार्फत ही तपासणी होणार असून, प्रत्येक तालुक्यासाठी इतर जिल्ह्यांतील पंचायत समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. या समित्या संबंधित ग्रामपंचायतींना भेट देऊन नोंदी, कामांची पाहणी, प्रत्यक्ष स्थळभेट, लाभार्थ्यांशी संवाद आणि सेवा वितरण प्रणालीची तपासणी करतील.

Evaluation of 276 Gram Panchayats in the district will be done

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

थोर तत्त्वज्ञ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…

2 days ago

शांघाय परिषदेचे फलित

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…

2 days ago

शहर अस्वच्छ करणार्‍यांचा शोध

घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…

2 days ago

खडकाळ जमिनीत शिक्षकांनी रुजविली हिरवाई

शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…

2 days ago

अघोषित भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त!

दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…

2 days ago

माध्यमिक शिक्षणाला मिळणार बळ

708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…

2 days ago