♦ मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान
♦ तालुकास्तरीय बाह्य समितीकडून मूल्यमापन सुरू
नाशिक : प्रतिनिधी
राज्याचे ग्रामविकास तथा पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी तालुकास्तरीय बाह्य समितीकडून मूल्यमापन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये हा तपासणी कार्यक्रम सुरू झाला असून, दि. 26 एप्रिल ते दि. 15 मे 2026 यात ग्रामपंचायतींची तपासणी होणार आहे.
या अभियानाचा उद्देश ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यक्षमता, पारदर्शकता, सेवा वितरणाची गुणवत्ता आणि विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी यांचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करणे हा आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायतींनी राबविलेल्या विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत कितपत पोहोचला आहे, याचाही सखोल आढावा घेण्यात येणार आहे.
सुधारित नियोजनानुसार बागलाण तालुक्यासाठी मंठा (जालना), चांदवडसाठी घनसावंगी (जालना), देवळ्यासाठी जालना, दिंडोरीसाठी जाफ्राबाद (जालना), इगतपुरीसाठी अंबरनाथ (ठाणे), कळवणसाठी परतूर (जालना), मालेगावसाठी गंगाखेड (परभणी), नांदगावसाठी पूर्णा (परभणी), नाशिक तालुक्यासाठी वाडा (पालघर), निफाडसाठी अंबड (जालना), पेठसाठी जव्हार (पालघर), सिन्नरसाठी बदनापूर (जालना), सुरगाण्यासाठी शहापूर (ठाणे), त्र्यंबकेश्वरसाठी विक्रमगड (पालघर) आणि येवला तालुक्यासाठी पालम (परभणी) या पंचायत समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या तपासणी अंतर्गत जिल्ह्यातील एकूण 276 ग्रामपंचायतींचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. समित्यांकडून शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार गुणांकन करण्यात येईल.
यामध्ये स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, शिक्षण, डिजिटल सेवा, ग्रामनिधीचा वापर, महिला व बालकल्याण उपक्रम, तसेच विविध केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची अंमलबजावणी यांचा समावेश असेल.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व संबंधित पंचायत समित्या, ग्रामपंचायती तसेच अधिकारी व कर्मचार्यांना या मूल्यमापन प्रक्रियेत सक्रिय सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामुळे ग्रामीण भागातील विकास प्रक्रियेला गती मिळाली असून, ग्रामपंचायतींमध्ये स्पर्धात्मकता वाढून उत्तम कामगिरीस प्रोत्साहन मिळाले असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे यांनी दिली.
जिल्ह्यातील सर्व 15 तालुक्यांमध्ये तपासणी
नाशिक जिल्ह्यातील सर्व 15 तालुक्यांमध्ये बाह्य तालुकास्तरीय समितीमार्फत ही तपासणी होणार असून, प्रत्येक तालुक्यासाठी इतर जिल्ह्यांतील पंचायत समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. या समित्या संबंधित ग्रामपंचायतींना भेट देऊन नोंदी, कामांची पाहणी, प्रत्यक्ष स्थळभेट, लाभार्थ्यांशी संवाद आणि सेवा वितरण प्रणालीची तपासणी करतील.
Evaluation of 276 Gram Panchayats in the district will be done
‘वर्षामागूनी वर्ष सरती ऋतू मागूनी ऋतू’ या गाण्याच्या ओळीप्रमाणे ऋतू चक्र फिरत असते. महिने, वर्ष…
अनेकांना वाटतं की, पेट्रोल-डिझेल महागलं की फक्त स्वतःची गाडी असणार्यांनाच फटका बसतो. पण हे अर्थशास्त्र…
बालपण म्हणजे जणू सुंदर स्वप्न. जे जगताना कधी कळत नाही, पण नंतर आठवलं की डोळे…
पोलिसांचा कानाडोळा; वाहतूक कोंडीत भर नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी मोहीम शहर…
109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…
1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…