शेती नांगरणी करताना शेतकऱ्यांला आढळले भुयार
ग्रामस्थांनी केली भुयार गर्दी, पुरातत्व विभागाला केले पाचारण…
नाशिक: प्रतिनिधी
मनमाड नजीक असलेल्या अनकवाडे येथील युवराज राजाराम धिवर यांच्या शेतात ते नांगरटी करत असताना त्यांना अचानकपणे एक खड्डा दिसला तो खड्डा बघुन त्यांनी तात्काळ ग्रामसेवक व तलाठी याना सांगितले त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली व आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत सूचना केल्या पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली व पुरातत्व विभागाला याबाबत माहिती देण्यात आली आहे.पुरातत्त्व विभागाचे अधिकारी पाहणी करून अहवाल देतील तेव्हा हे भुयार कसले याबाबत माहिती देण्यात येईल असे तलाठी प्रतिभा नागलवाद यांनी सांगितले.
पूर्वी धान्य किंवा इतर मौल्यवान वस्तू सुरक्षित राहण्यासाठी आशा प्रकारे भुयार करून त्या ठिकाणी या वस्तू ठेवण्यात येत होत्या.याशिवाय या शेताच्या अगदी बाजूला अंकाई किल्ला आहे कदाचित या किल्यावर जाण्यासाठी येण्यासाठी या भुयराचा वापर केला जात असेल असेही काही जुन्या नागरिकांनी सांगितले आहे मात्र हे काय आहे हे आता पुरातत्व विभागाचे अधिकारी येऊन सांगतील हेही तितकेच खरे आहे.
‘वर्षामागूनी वर्ष सरती ऋतू मागूनी ऋतू’ या गाण्याच्या ओळीप्रमाणे ऋतू चक्र फिरत असते. महिने, वर्ष…
अनेकांना वाटतं की, पेट्रोल-डिझेल महागलं की फक्त स्वतःची गाडी असणार्यांनाच फटका बसतो. पण हे अर्थशास्त्र…
बालपण म्हणजे जणू सुंदर स्वप्न. जे जगताना कधी कळत नाही, पण नंतर आठवलं की डोळे…
पोलिसांचा कानाडोळा; वाहतूक कोंडीत भर नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी मोहीम शहर…
109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…
1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…