नाशिक

अकरावीसाठी ३० पासून ऑनलाइन अर्ज भरता येणार

 

नाशिक : प्रतिनिधी महापालिका क्षेत्रात इयत्ता अकरावीची प्रवेशप्रक्रिया केंद्रीभूत ऑनलाइन पद्धतीने राबविली जाणार आहे . शैक्षणिक वर्ष २०२२ २३ च्या प्रवेशासंदर्भात शिक्षण विभागाने महत्त्वाची घोषणा केली आहे . त्यानुसार इयत्ता दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी येत्या ३० मेपासून ऑनलाइन पद्धतीने अर्जाचा भाग एक भरता येणार आहे . राज्यात नाशिक महापालिकेसह मुंबई महानगर क्षेत्र , पुणे , पिंपरी – चिंचवड , अमरावती , नागपूर महापालिका क्षेत्रात केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने अकरावीची प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे . उर्वरित महाराष्ट्रातील प्रवेश प्रचलित पद्धतीनुसार करण्यात येतील , असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे . दरम्यान , केंद्रीय ऑनलाइन पद्धतीअंतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया ३० मेपासून सुरू होईल . अर्जाचा भाग एक भरताना विद्यार्थ्यांना वैयक्तिक माहिती दाखल करता येईल . तर निकाल जाहीर झाल्यानंतर शाखा व महाविद्यालयाचे प्राधान्यक्रम निवडीकरिता अर्जाचा भाग दोन भरता येणार आहे . यासंदर्भातील सविस्तर वेळापत्रक दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर घोषित केला जाणार आहे . दरम्यान , प्रत्यक्षात अर्ज भरताना चूक होऊ नये म्हणून अर्ज भरण्याचा सराव करण्याची सुविधा ( मॉक डेमो रजिस्ट्रेशन ) शिक्षण विभागाने उपलब्ध करून दिलेली आहे . सोमवार ( दि . २३ ) पासून २७ मे दरम्यान विद्यार्थ्यांना नोंदणी व अर्ज भरण्याचा सराव करता येणार आहे . यानंतर २८ मेस ही माहिती नष्ट करण्यात येईल . प्रत्यक्षात अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ही माहिती दाखल करणे आवश्यक राहणार आहे .

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

मातीशी नातं आणि शिक्षणाची वाट

Relationship with the soil and the path to education

21 hours ago

जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात गती

- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…

21 hours ago