संपादकीय

भारतीय ‘डीएनए’ ते इंडो-पॅसिफिक भागीदारी

– समाधान कदम

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इंडोनेशिया दौरा

भारत आणि इंडोनेशिया हे केवळ दोन शेजारी सागरी देश नाहीत, तर हजारो वर्षांच्या सांस्कृतिक, व्यापारी आणि ऐतिहासिक नात्याने जोडलेले दोन महत्त्वाचे आशियाई देश आहेत. हिंद महासागराच्या लाटांवरून प्राचीन काळात सुरू झालेला हा संबंध आज इंडो-पॅसिफिक प्रदेशातील सामरिक भागीदारीपर्यंत पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंडोनेशिया दौर्‍याने या मैत्रीला नवे परिमाण दिले असून, दोन्ही देशांनी संरक्षण, व्यापार, डिजिटल तंत्रज्ञान, सागरी सुरक्षा आणि सांस्कृतिक सहकार्य अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

या दौर्‍यातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांनी भारतीय समुदायाशी संवाद साधताना केलेला भारतीय डीएनएचा उल्लेख. त्यांनी एका जीनोम चाचणीचा संदर्भ देत
स्वतःमध्ये भारतीय वंशाशी संबंधित आनुवंशिक घटक असल्याचे मिश्कीलपणे सांगितले. भारतीय संगीत ऐकले की, आपले पाय आपोआप ताल धरतात, असेही त्यांनी हसत सांगितले. या विधानाकडे अनेकांनी भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील ऐतिहासिक-सांस्कृतिक जवळीकीचे प्रतीक म्हणून पाहिले.
भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील संबंधांचा इतिहास दोन हजार वर्षांहून अधिक जुना आहे. भारतीय व्यापारी, बौद्ध आणि हिंदू धर्मप्रचारक, तसेच समुद्री मार्गांनी झालेल्या सांस्कृतिक देवाणघेवाणीमुळे इंडोनेशियाच्या संस्कृतीवर भारतीय परंपरेचा मोठा प्रभाव पडला. आजही बालीमध्ये हिंदू संस्कृती जिवंत आहे. इंडोनेशियातील रामायण आणि महाभारतावरील नृत्यनाट्ये, गरुड हे राष्ट्रीय प्रतीक, संस्कृतमधून आलेले अनेक शब्द आणि सांस्कृतिक परंपरा या इतिहासाची साक्ष देतात. त्यामुळे दोन्ही देशांतील मैत्री ही केवळ राजनैतिक नसून सांस्कृतिक भावनेवर आधारलेली आहे.
या दौर्‍यात संरक्षण आणि सागरी सुरक्षेला विशेष महत्त्व देण्यात आले. इंडो-पॅसिफिक प्रदेश आज जागतिक राजकारणाचे केंद्र बनला आहे. दक्षिण चीन समुद्रातील वाढते तणाव, मुक्त नौवहनाचे महत्त्व आणि सागरी व्यापारमार्गांची सुरक्षा या पाश्वर्र्भूमीवर भारत आणि इंडोनेशिया यांचे सहकार्य अधिक आवश्यक झाले आहे. दोन्ही देशांनी संरक्षण क्षेत्रातील सहकार्य वाढवणे, संयुक्त लष्करी सराव, दहशतवादविरोधी कारवाई आणि सागरी सुरक्षेसाठी माहितीची देवाणघेवाण वाढवण्यावर भर दिला. आर्थिक क्षेत्रातही या भेटीचे महत्त्व कमी नाही. भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणार्‍या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे, तर इंडोनेशिया हा आग्नेय आशियातील सर्वात मोठा आर्थिक देश आहे. ऊर्जा, कोळसा, पाम तेल, औषधनिर्मिती, कृषी, हरित ऊर्जा, डिजिटल अर्थव्यवस्था आणि महत्त्वाची खनिजे या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर दोन्ही देशांनी भर दिला. पुरवठा साखळी अधिक मजबूत करणे आणि परस्पर गुंतवणूक वाढवणे ही दोन्ही देशांची समान भूमिका आहे. डिजिटल क्षेत्रात भारताने जगासमोर आदर्श निर्माण केला आहे. यूपीआयसारख्या डिजिटल पेमेंट प्रणालीमुळे आर्थिक व्यवहार अधिक सुलभ झाले आहेत. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, फिनटेक आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचा अनुभव इंडोनेशियासाठी उपयुक्त ठरू शकतो. त्यामुळे डिजिटल सहकार्य हा भविष्यातील संबंधांचा महत्त्वाचा आधार ठरणार आहे. भारताच्या विदेश’ धोरणात इंडोनेशियाला विशेष स्थान आहे. त्याचप्रमाणे इंडोनेशियाच्या ’ग्लोबल मेरीटाईम फुलक्रम’ या दृष्टीकोनात भारत हा महत्त्वाचा भागीदार आहे. हिंद महासागर आणि मलक्का सामुद्रधुनी हे जागतिक व्यापाराचे अत्यंत महत्त्वाचे मार्ग आहेत. या मार्गांवरील शांतता आणि सुरक्षितता केवळ भारत व इंडोनेशियासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी आवश्यक आहे.
दोन्ही देशांनी हवामान बदल, अक्षय ऊर्जा, आपत्ती व्यवस्थापन आणि शाश्वत विकास यांसारख्या जागतिक प्रश्नांवरही सहकार्य वाढवण्याची तयारी दर्शवली. विकसनशील देशांचा आवाज अधिक प्रभावीपणे जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी जी-20, आसियान आणि इतर बहुपक्षीय मंचांवर एकत्र काम करण्याची भूमिकाही दोन्ही नेत्यांनी मांडली. या दौर्‍यात लोकशाही मूल्यांचाही उल्लेख झाला. भारत आणि इंडोनेशिया या दोन्ही देशांनी विविधता, लोकशाही आणि संविधानिक व्यवस्थेवर आधारित विकासाचा मार्ग स्वीकारला आहे. आशियातील दोन मोठ्या लोकशाही देशांमधील वाढते सहकार्य हे प्रादेशिक स्थैर्यासाठी सकारात्मक मानले जाते. आजच्या बदलत्या जागतिक व्यवस्थेत कोणताही देश एकटा प्रगती करू शकत नाही. सामरिक सहकार्य, आर्थिक भागीदारी आणि सांस्कृतिक विश्वास यांच्या आधारावरच भविष्यातील विकास शक्य आहे. भारत आणि इंडोनेशिया यांनी याच दिशेने पुढे जाण्याचा निर्धार या दौर्‍यात व्यक्त केला आहे. राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांनी केलेला भारतीय ऊछ-चा उल्लेख हा या दौर्‍यातील चर्चेचा विषय ठरला; परंतु या एका विधानापलीकडे पाहिले, तर या भेटीचे खरे महत्त्व भारत-इंडोनेशिया संबंधांना मिळालेल्या नव्या गतीत आहे. इतिहासातील सांस्कृतिक बंध, वर्तमानातील सामरिक हितसंबंध आणि भविष्यातील आर्थिक संधी यांचा सुंदर संगम या दौर्‍यात दिसून आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इंडोनेशिया दौरा हा केवळ राजनैतिक कार्यक्रम नव्हता; तो आशियातील दोन महत्त्वाच्या लोकशाही राष्ट्रांनी परस्परविश्वास, सहकार्य आणि सामायिक हितसंबंधांच्या आधारावर भविष्यातील भागीदारी अधिक मजबूत करण्याचा संकल्प होता. आगामी काळात इंडो-पॅसिफिक प्रदेशातील शांतता, सुरक्षितता आणि आर्थिक समृद्धी घडविण्यात भारत आणि इंडोनेशिया यांची ही भागीदारी निश्चितच महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल दोघे देश अपेक्षा करत आहे की परस्पर सहकार्य आणि यपरतून दोघे राष्ट्र स्वतःचा विकास व्हावा, हीच माफक अपेक्षा!

From Indian ‘DNA’ to Indo-Pacific Partnership

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

शतपावलीसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील पोत हिसकावली

सिडको : प्रतिनिधी जेवण झाल्यानंतर घरासमोर शतपावली करण्यासाठी बाहेर पडलेल्या 72 वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची…

1 minute ago

मालेगावात प्रतिबंधित औषधांचा साठा जप्त

तिघांना अटक; 67 हजार अल्प्राझोलम गोळ्या, कोडीन सिरप मालेगाव : प्रतिनिधी मालेगाव पोलिसांनी अमली पदार्थ…

8 minutes ago

तरुणाचा आयफोनचा हट्ट; संभाजीनगरात संपले कुटुंब!

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगरजवळील वाळूज-तीसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर एका अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक…

14 minutes ago

राज्यातील पोलीस ठाण्यांच्या रचनेत मोठे बदल

सध्याचे मनुष्यबळ 1960 च्या निकषांवर आधारित; गुन्ह्यांच्या संख्येनुसार पोलीस ठाण्याचा गट मुंबई : प्रतिनिधी राज्यातील…

24 minutes ago

‘पॅलेट गन’प्रकरणी गुन्हा दाखल

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आंदोलनाला यश नवी दिल्ली : प्रतिनिधी ‘नीट’ परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात आंदोलन…

36 minutes ago

सिंहस्थात स्वयंसेवी संस्थांचे योगदान

- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…

21 hours ago