महाराष्ट्र

लुटारू महिलांची टोळी धुळ्यातून जेरबंद

नाशिक : वार्ताहर
एकट्या वयस्कर व महिला प्रवाशांना लक्ष्य करुन त्यांचे सोन्याचे दागिने लांबविणार्‍या तीन महिलांच्या टोळीला मुंबई नाका पोलिसांनी जेरबंद केले आहे.
दमण येथील मंगल माधवराव क्षीरसागर या नाशिकला बहिणीला भेटण्यासाठी आल्या होत्या. त्या द्वारका येथून रिक्षामधून येत असताना रिक्षाचालकाने रिक्षात बसलेल्या 3 महिलांशी संगनमत करून क्षीरसागर यांच्या बॅगेतील एकूण 3 लाख 13 हजार 250 रुपयेे सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केले होते. त्यांना पाथर्डीफाटा येथे न सोडता राणेनगर येथेच उतरून दिले होते. दागिने लंपास झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रोहोकले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपास केला असता यात रिक्षाचालक सहभागी असल्याने त्यांनी बड्डा उर्फ अनिल करमसिंग देंगे रा. कॅन्टोमेन्ट, देवळाली कॅम्प, नाशिक रोड यास ताब्यात घेतले होते. त्याने या महिलांबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलीस पथकाने धुळे येथे जात शीतल गोकुळ कसबे उर्फ कासोदे (रा. एकता नगर, देवपूर धुळे) व अनिता विजय समाणे रा. हरीविठ्ठल नगर, जळगांव) यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून चोरीतील साडेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, पोलीस उप आयुक्त अमोल तांबे, सहाय्यक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रोहोकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे चंद्रकांत अहिरे, सहायक पोलीस निरीक्षक के. टी. गेंदळे, पोलीस हवालदार रोहिदास सोनार, पोलीस शिपाई आप्पा पानवळ, पोलीस शिपाई समीर शेख, महिला पोलीस नाईक योगिता फरसाळे यांनी ही कामगिरी केली.

हा ऐवज हस्तगत
4 ग्रँम वजनाचे डोरले, 4 ग्रँम वजनाचे मंगळसूत्र 26 हजार 500 रु. किंमतीची सोन्याची चेन, 11 हजार 750 रु. किंमतीचेे 2 टॉप्स, 9 हजार 790 रु. किंमतीचे 1 सोन्याची अंगठी, 5 हजार240 रू. किंमतीचे 1 सोन्याचे पेंडट असा मुद्देमाल या महिलांकडून पोलिसांनी हस्तगत केला. या महिलांवर यापूर्वी मुकुंदवाडी पोलिस.स्टेशनसह औरंगाबाद, अमळनेर सिटी पो.स्टे. जळगांव व देवपूर पो.स्टे., धुळे येथे चोरीचे 3 गुन्हे दाखल आहेत.

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

18 minutes ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

25 minutes ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

31 minutes ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

37 minutes ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

42 minutes ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

57 minutes ago