मुंबई : प्रतिनिधी
राज्यात आता प्रचंड उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. कमाल तापमानाचा पारा 36 अंश सेल्सिअस पार करून चाळीशी गाठतानाचे चित्र आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील दोन दिवस राज्यभर उष्णतेचा अलर्ट दिला आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड या जिल्ह्यांना उष्ण व आर्द्र हवामानाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस राज्यभरात कमाल तापमानात वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. विदर्भात पुढील दोन दिवसांत पारा तापणार असून, तीन जिल्ह्यांना उन्हाचा तडाखा बसणार आहे. पुढील दोन दिवसांत राज्यातील कमाल तापमान दोन ते तीन अंशांनी वाढणार आहे. महिन्याच्या अखेरीस तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे जाईल, असा अंदाज हवामानतज्ज्ञ एस. डी. सानप यांनी वर्तवला आहे.
अमरावतीत सर्वाधिक तापमान
सर्वाधिक तापमानाची नोंद अमरावती जिल्ह्यात झाली. 40.8 अंश सेल्सिअस तापमान अमरावतीत नोंदवले गेले. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील तापमान हे 36 ते 38 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. प्रादेशिक हवामान खात्याने विदर्भात पुढील दोन दिवस तापमानाचा हाय अलर्ट दिला आहे. अकोला, अमरावती आणि वर्ध्यात पुढील दोन दिवस पारा चाळीशी पार जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Heat will increase in the state
‘वर्षामागूनी वर्ष सरती ऋतू मागूनी ऋतू’ या गाण्याच्या ओळीप्रमाणे ऋतू चक्र फिरत असते. महिने, वर्ष…
अनेकांना वाटतं की, पेट्रोल-डिझेल महागलं की फक्त स्वतःची गाडी असणार्यांनाच फटका बसतो. पण हे अर्थशास्त्र…
बालपण म्हणजे जणू सुंदर स्वप्न. जे जगताना कधी कळत नाही, पण नंतर आठवलं की डोळे…
पोलिसांचा कानाडोळा; वाहतूक कोंडीत भर नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी मोहीम शहर…
109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…
1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…