गोकुळ गिते यांचा विरोधकांना टोला
पंचवटी : प्रतिनिधी
नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या रणसंग्रामाला आता खर्या अर्थाने सुरुवात झाली आहे.अर्ज माघार घेण्याची मुदत संपल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे, अपक्ष उमेदवार गोकुळ गिते आणि अपक्ष उमेदवार प्रसाद हिरे हे निवडणुकीच्या रिंगणात असून, या निवडणुकीत खर्या अर्थाने नरेंद्र दराडे विरुद्ध गोकुळ गिते अशीच चुरशीची लढत होणार असल्याचे चित्र बघायला मिळणार आहे. त्यामुळे ज्यांनी आमचा बाप काढला, त्यांना आम्ही पाठिंबा कसा देणार, असा टोला अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी हाणला आहे. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनदेखील गिते यांनी केले आहे.
गुरुवारी (दि.4) अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर सोशल मीडियावर एक नवीनच राजकीय चर्चा आणि अफवांना ऊत आला होता. अपक्ष उमेदवार गोकुळ गिते हे महायुतीला जाहीर पाठिंबा देणार असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्या जात होत्या. या सर्व चर्चांवर आता स्वतः गोकुळ गिते यांनी माध्यमांसमोर येत पडदा टाकला असून, विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
सोशल मीडियावरील त्या पोस्ट पूर्णपणे अफवा असल्याचे गोकुळ गिते यांनी सांगितले. माघार घेण्याची मुदत संपली आहे. निवडणुकीच्या प्रचारात ज्या उमेदवाराने आमचा बाप काढला, त्या उमेदवाराला आम्ही कसा काय पाठिंबा देऊ शकतो? आता निवडणूक खूप पुढे गेली आहे, त्यामुळे कोणालाही पाठिंबा देण्याचा विषयच उरत नाही. या सर्व जाणीवपूर्वक पसरवल्या जाणार्या अफवा आहेत, मतदारांनी अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
लढत होणार चुरशीची
गोकुळ गिते यांनी पाठिंब्याची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावल्यामुळे आता या निवडणुकीतील रंगत आणखी वाढली आहे. महायुतीचे नरेंद्र दराडे आणि अपक्ष गोकुळ गिते यांच्यात काट्याची टक्कर होणार असल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे.
How can we support those who took away our father?
- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…
- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…
ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…
आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…
पंचवीस वर्षांपासून शेतकर्यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…