आकाश झाले पतंगमय; युवकांचा अमाप उत्साह
येवला : प्रतिनिधी
मकरसंक्रांतीनिमित्त भोगीच्या पहिल्या दिवशी ढोल-ताशाचा गजर, फटाक्यांची आतषबाजी अन् अमाप उत्साहाच्या वातावरणात येवला शहरात पतंग महोत्सवाला प्रारंभ झाला. सकाळी शहरातील आकाशात लाखो पतंग झेपावले. पतंग उडविण्यासाठी शहरातील इमारत, तसेच घरांच्या गच्चीवर युवकांनी पतंग हातात घेऊन पतंगोत्सवाला प्रारंभ केला. तीन दिवस चालणार्या या पतंगोत्सवाला धूमधडाक्यात सुरुवात झाली आहे.
वकाट… काटे… बढाव… बढाव… अशा विविध आवाजाने शहर दुमदुमून गेले. रंगीबेरंगी, तसेच विविध प्रकारचे आकर्षक पतंग आकाशात झेपावले. युवक-युवती, बच्चेकंपनी आदींनी पतंग उडविण्याचा मनमुराद आनंद लुटला. दिवसभर हवेच्या कमी- जास्त प्रमाणामुळे पतंगप्रेमींचा थोडा हिरमोड झाला. मात्र, दुपारी तीननंतर हवेच्या वेगाने गती घेतल्यामुळे पतंग अधिक प्रमाणात हवेत झेपावले. यानिमित्ताने शहरातील सर्व आकाश पतंगमय झाले होते.
मकरसंक्रांतीनिमित्ताने पाहुणे मंडळी येवल्यात दाखल झाली आहे. या मंडळींनीदेखील पतंग उडविण्याचा आनंद लुटला. शहरातील इमारती व गच्चीवर ध्वनिवर्धक लावण्यात आले. शहरातील प्रसिद्ध वाद्य हलकडीच्या तालावर युवकांनी ठेका धरला. काही ठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात युवकांनी ठेका धरला. पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाकडून नायलॉन मांजावर बंदी असल्याने शहरात साध्या मांजाचा वापर करून पतंग महोत्सव साजरा करण्यात
येत आहे.
पतंगप्रेमींनी यंदा प्रशासनाच्या कायद्याचे पालन करून साध्या मांजाचा वापर करून पतंगोत्सवाला सुरुवात केली. तीन दिवस चालणार्या पतंगोत्सवात नायलॉन मांजाचा वापर करण्यात येऊ नये, यासाठी पोलीस निरीक्षक अनिल भवारी, मुख्याधिकारी तुषार आहेर, पालिकेच्या स्वच्छता विभागप्रमुख पूनम भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली नायलॉन मांजाविरोधी पथक शहरात नेमण्यात आले आहे. पतंग उडवताना नायलॉन मांजाचा वापर कोणी केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस व नगरपालिका प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, आज, बुधवारी संक्रांत असल्याने यापेक्षा अधिक प्रमाणात पतंग हवेत झेपावतील.
Kite flying on the first day in Yeola
- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…
- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…
ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…
आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…
पंचवीस वर्षांपासून शेतकर्यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…