महाराष्ट्र

लेकी घराचं चांदणं

पुरुषप्रधान भारतीय संस्कृतीत एकेकाळी मुलीच्या जन्माचं ओझं वाटत होतं… मुली परक्याचं धन म्हणून तिच्या जन्माचं स्वागत केलं जात नसे. पण आज काळ बदलला आणि मुलींविषयीच्या भावना काही प्रमाणात बदलल्या आहेत. मुली उच्च शिक्षण घेताना त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळत आहे. त्या आपल्यातील क्षमता सिद्ध करू लागल्या आहेत.
खरंच लेकी या घराचा भावनाप्रधान कोपरा असतात. हसतखेळत अंगण असतं. तिच्या जन्माने मनोमन आई सुखावते. तिच्या बाललीलांनी घर आनंदी होते. तिची दुडूदुडू पावले घराचं गोकुळ बनवतं. ती जन्मत:च समजदार असते. आईच्या प्रत्येक गोष्टीचे निरीक्षण ती करत असते व त्याप्रमाणे अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असते. ती जशी मोठी होत जाते तशी तिची भूमिका बदलत जाते.ती आईची मैत्रीण बनते तर प्रसंगी आईचीच आई बनते. बदलत्या काळानुसार दोन पिढीमधील अंतर समजून सांगताना ती आईला अपडेट बनवते. कधी कधी तर जगण्या-वागण्याचे कौशल्य लेकीकडून शिकायला मिळते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या अनेक गोष्टी मुलीकडून शिकायला मिळतात. तिच्याइतके समजदारपणे कुणीच आईला सांगू शकत नाही. आई आणि मुलीचं नातं जगावेगळं असतं. कधी रुसवेफुगवे, कधी आनंदाचे चांदणे. लेकी या आईचं प्रतिबिंब असतात. आई आपले स्वप्न लेकीमध्ये बघत असते. आपल्याला जे करता आलं नाही ते आपल्या लेकीने करून दाखवावं, असं मनातलं तिचं एक अबोल स्वप्न असतं. आपली मुलगी समाजात एक आदर्श कन्या व्हावी, असे संस्कार प्रत्येक आई मुलीवर करत असते.
आईप्रमाणेच वडिलांच्या काळजाचा तुकडा लेक असते. आपल्या मुलीला सर्व सुखे मिळावी, तिची सर्व स्वप्न पूर्ण व्हावीत, समाजात ती सुरक्षित राहावी यासाठी वडील कायम दक्ष असतात. तिच्या पंखांना भरारी देण्यासाठी ते नेहमीच तयार असतात.
अभ्यासाच्या बाबतीतही मुलींना जास्त सांगावे लागत नाही. त्यांना स्वतःच्या क्षमता कळतात आणि त्याप्रमाणे संधी मिळेल त्याप्रमाणे थोरामोठ्यांच्या मार्गदर्शनाखाली ध्येय ठरवून त्या वाटचाल करत असतात. एखादी गोष्ट मनावर घेतली तर त्या अगदी मन लावून पूर्ण करतात. आज मुलींनी यशाच्या अनेक पायर्‍या पादाक्रांत केल्या आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रात कौशल्य पणाला लावून त्या समाजाच्या दिशादर्शक ठरत आहेत. आई-वडिलांचा अभिमान जपत नाव मोठं करत आहे. उतारवयात आई-वडिलांचा आधार बनत आहे. अशा या लेकी घराचं तेजस्वी चांदणं असतात…

सविता दिवटे-चव्हाण

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

2 hours ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

2 hours ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

2 hours ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

2 hours ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

3 hours ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

3 hours ago