उत्तर महाराष्ट्र

मनपा, जि,प.च्या निवडणुकीचे बिगुल वाजणार

नाशिक : प्रतिनिधी
सुप्रीम कोर्टाने ओबीसींना 27 टक्के आरक्षण देण्याचे जाहीर केल्याने आता ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेली निवडणुकीची प्रक्रिया आता सुरू होणार आहे. राज्यात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्यास सर्वच राजकीय पक्षांचा विरोध होता. त्यामुळे नगरपंचायत आणि नगरपालिकांच्या निवडणुकाही पुढे ढकलण्यात आल्या होत्या. तर मुदत संपलेल्या महापालिकांच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही लांबणीवर टाकण्यात आलेल्या होत्या. निवडणुका लांबल्यामुळे इच्छुक उमेदवारांचा जीव टांगणीला लागण्याबरोबरच मतदारांना सांभाळण्यासाठीही मोठी कसरत करावी लागत होती. मात्र, आता सुप्रीम कोर्टानेच दोन आठवड्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याचे निर्देश दिल्याने आता लवकरच निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. त्यामुळे इच्छुक आता कामाला लागणार आहेत.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

1 hour ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

1 hour ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

1 hour ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

1 hour ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

1 hour ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

2 hours ago