नाशिक

अन्यायकारक घरपट्टीसह उद्योजकांचे सर्व प्रश्‍न आठ दिवसांत सोडविणार

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक, अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांना आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा पुरविल्या जातील आणि महापालिकेशी निगडित असलेले अन्यायकारक घरपट्टीसह सर्व ज्वलंत प्रश्‍न सोडविले जातील, असे आश्‍वासन नाशिक महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी दिले. आयमाच्या पदाधिकार्‍यांनी आयमा अध्यक्ष निखिल पांचाळ यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त रमेश पवार यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. त्यावेळी चर्चेस उत्तर देताना पवार बोलत होते.
एमआयडीसीने सातपूर औद्योगिक वसाहतीत फायर स्टेशन कार्यान्वित करून ते नाशिक महानगरपालिकेस चालविण्यासाठी दिले आहे. ते आजतागायत चालू आहे. त्याचप्रमाणे एमआयडीसीने अंबड औद्योगिक वसाहतीतही फायर स्टेशन उभारून ते कार्यान्वित केले आहे. मात्र, एमआयडीसीने अंबड औद्योगिक वसाहतीला स्वतंत्र फायर सेस आकारला आहे. याचाच अर्थ अंबड औद्योगिक वसाहतीला दोन वेगवेगळ्या मंडळांना म्हणजे महापालिका आणि एमआयडीसीला कर भरावा लागतो. सदर बाब गंभीर असून, त्यात आपण जातीने लक्ष घालावे आणि एमआयडीसीच्या सहमतीने अंबड औद्योगिक वसाहतीतील फायर स्टेशन महापालिकेने ताब्यात घेऊन ते चालवावे, जेणेकरून उद्योजकांवर अतिरिक्त कराचा बोजा पडणार नाही, असे पांचाळ यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. राज्यातील इतर महानगरपालिका तसेच नगरपालिकांच्या दराशी तुलना केल्यास नाशिकच्या उद्योजकांना घरपट्टीचा फार मोठा बोजा सहन करावा लागतो, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही, अशी विनंतीसुद्धा पांचाळ यांनी निवेदनात केली आहे. अंबड औद्योगिक वसाहतीत नुकतीच एका उद्योजकाची जी हत्या झाली त्यामुळे औद्योगिक वसाहतीतील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न अधिक बिकट झाला आहे. औद्योगिक वसाहत परिसरात पाण्याचा मुबलक पुरवठा करावा, असेही निवेदनात नमूद केले आहे. या सर्व प्रश्‍नांबाबत लवकरच सर्व यंत्रणांची बैठक बोलवावी, अशी विनंती शिष्टमंडळातर्फे करण्यात आली.
येत्या आठ दिवसांच्या आत या सर्व प्रश्‍नांसंदर्भात तातडीने बैठक बोलावून हे सर्व प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन आयुक्त रमेश पवार यांनी शिष्टमंडळास दिले, असेही पांचाळ यांनी निवेदनात नमूद केले. चर्चेत आयमाचे उपाध्यक्ष सुदर्शन डोंगरे, खजिनदार राजेंद्र कोठावदे, सचिव योगिता आहेर आदींनीही भाग घेतला.

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

3 hours ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

3 hours ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

3 hours ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

3 hours ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

3 hours ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

4 hours ago