नाशिक

इच्छुकांच्या अपेक्षांना पुन्हा एकदा धुमारे

नाशिक : प्रतिनिधी
न्यायालयाने ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचेनिर्देश दिल्यानंतर अंतिम प्रभागरचना शनिवारी जाहीर करण्यात आली. तीन सदस्यीय प्रभाग कायम ठेवण्यात आल्यामुळे पूर्वीचीच रचना कायम राहणार आहे. प्रभागरचना जाहीर झाल्यामुळे इच्छुकांच्या थंडावलेल्या हालचालींना पुन्हा वेग येण्याची आता शक्यता निर्माण झाली आहे.
महापालिकेची मुदत संपल्यामुळे निवडणुका जाहीर होण्याची चिन्हे दिसत असतानाच, ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून निवडणुका लांबणीवर पडल्या. निवडणुकांच्या तयारीला लागलेल्या इच्छुकांमध्ये त्यामुळे काहीसा हिरमोड झाला होता. अनेक इच्छुकांनी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मतदारांशी संपर्क अभियान सुरू केले होते. तर काहींनी संपर्क कार्यालये उघडून जनतेचे प्रश्‍न, अडचणी सोेडविण्यासाठी संपर्क कार्यालयातच ठाण मांडले होते. काहींनी निवडणुकीच्या तोंडावर प्रभागामध्ये विकासकामांच्या उद्घाटनाचा आणि भूमिपूजनाचा धडाकाच लावला होता. पण ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुढे आल्याने निवडणुका लांबणीवर पडल्या. परिणामी, आता सहा महिने तरी निवडणुका होत नाही, अशी शक्यता गृहीत धरून इच्छुकांच्या हालचाली थंडावल्या. सोशल मीडियाच्या माध्यमातून दररोज सकाळी गुड मॉर्निंगचे पाठविण्यात येणारे मेसेजही काहींनी बंद करून टाकले. मात्र, आता प्रभागरचना जाहीर झाल्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या अपेक्षांना पुन्हा एकदा धुमारे फुटले आहेत.
एका प्रभागात तीन उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत. त्यामुळे आता मागील इच्छुकांना तयारीसाठी नव्याने वेळ मिळाला आहे. प्रभागरचनेमध्ये फारसे बदल झालेले नसल्याने इच्छुकांनी समाधान व्यक्त केले आहे. राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे निवडणुकांमध्ये कोणत्या पक्षाशी युती अथवा आघाडी होते की स्वबळावर निवडणूक लढविली जाते, यावर इच्छुक डोळा ठेवून आहेत. राज्यात भोंग्यांच्या प्रश्‍नावरून राजकारण तापलेले आहे. त्यातच मध्यंतरी पक्ष प्रवेशाचे सोहळे चांगलेच रंगू लागले होते.  स्वपक्षात राहून निवडून येण्याची शक्यता मावळल्याने अथवा तिकीट मिळण्याची खात्री नसल्याने काहींनी इतर पक्षामध्ये प्रवेश करण्याचे ठरविले होते. तथापि, त्यालाही नंतरच्या काळात ब्रेक बसला होता. आता पुन्हा एकदा नव्याने गणिते मांडली जाणार असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

मातीशी नातं आणि शिक्षणाची वाट

Relationship with the soil and the path to education

20 hours ago

जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात गती

- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…

20 hours ago