जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर घोषणाबाजी
नाशिक :
प्रस्तावित बाह्य रिंगरोड प्रकल्पासाठी दाखल झालेल्या हरकतींवरील सुनावणीला गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सुरुवात झाली. मात्र, प्रत्यक्ष सुनावणी न घेता केवळ हरकतींचे अर्ज स्वीकारण्यात आल्याने संतप्त शेतकर्यांनी प्रशासनावर सुनावणी केवळ औपचारिकता ठरली, असा आरोप केला. यावेळी जिरायती जमिनींना बागायती दराने मोबदला, पोटहिस्सा मोजणी आणि
सर्वोत्तम सुधारित दराने भरपाई देण्याची प्रमुख मागणी शेतकर्यांनी केली.
सिंहस्थ कुंभमेळा-2027 च्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेसाठी 65.5 किलोमीटरचा बाह्य रिंगरोड प्रस्तावित असून, त्यासाठी सुमारे 366 हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. हा प्रकल्प तीन तालुक्यांतील अनेक गावांमधून जाणार असल्याने सुपीक शेती, घरे आणि व्यावसायिक मालमत्ता बाधित होणार आहेत. त्यामुळे शेतकर्यांनी भूसंपादन प्रक्रियेविरोधात मोठ्या प्रमाणावर हरकती, सूचना आणि फेरविचार अर्ज दाखल केले
आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत गावनिहाय सुनावणीचे नियोजन करण्यात आले होते. पहिल्या दिवशी बारा गावांतील शेतकर्यांना बोलावण्यात आले. मात्र, प्रत्यक्ष चर्चेद्वारे हरकतींची सुनावणी न करता केवळ अर्ज स्वीकारण्यात आल्याचा आरोप उपस्थित शेतकर्यांनी केला. कोणत्याही मुद्यावर स्पष्ट निर्णय न देता लेखी स्वरूपात म्हणणे नोंदवून घेण्यात आले, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली.
सहायक जिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी अर्पिता ठुबे, उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. शेतकर्यांचा वाढता रोष लक्षात घेता प्रशासनाने हरकतींवरील निर्णय टपालाद्वारे संबंधितांना कळविण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.
आंदोलकांना प्रवेशद्वारावर रोखले
उपोषणस्थळी असलेल्या काही आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना मुख्य प्रवेशद्वारावरच रोखले. सर्व शेतकर्यांच्या मागण्या समान असल्याने प्रशासनाने सर्वांची एकत्रित सुनावणी घ्यावी, अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
रिंगरोड सुनावणीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दिवसभर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. वरिष्ठ पोलिस अधिकार्यांसह दंगल नियंत्रण पथकाची तुकडी तैनात करण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर रिंगरोडबाधित शेतकर्यांचे अन्नत्याग आमरण उपोषण सुरू असून, आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
Only applications accepted at Ring Road hearing: Farmers allege
- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…
- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…
ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…
आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…
पंचवीस वर्षांपासून शेतकर्यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…