चित्रपट महामंडळाकडून उत्तर महाराष्ट्राला सापत्न वागणूक

 

पत्रकार परिषद घेत नाशिक शाखेचा आरोप

नाशिक : प्रतिनिधी

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाकडून नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील सदस्यांना सापत्न वागणूक देण्यात येत असल्याचा आरोप अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या नाशिक शाखेच्या पदाधिकाऱ्यांकडून पत्रकार परिषद घेत करण्यात आला आहे.

यावेळी त्यांनी उत्तर महाराष्ट्रातील सदस्यांवर कशा प्रकारे अन्याय होत आहे, याची माहिती दिली. यात अ्‌ि‍खल भारतीय चित्रपट महामंडळाचा निवडणुक कार्यक्रम जाहीर झालेला असुन अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी नाशिकला मतदान केंद्र दिले होते व उत्तर महाराष्टातील सभासदांचा विचार केला होता. मेघराज राजेभोसले यांनी निवडणूक जाहीर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सुशांत शेलार, धनाजी यमकर व रणजित जाधव यांनी नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करत नाशिक मतदान केंद्राला वगळले. तर  मतदान केंद्र कोल्हापूर, मुंबई व पुणे इथेच ठेवले आहे. नाशिकला दिलेले मतदान केंद्र त्यांनी काढून घेऊन. उत्तर महाराष्टातील सभासदांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप नाशिक शाखेतील सदस्याकडून करण्यात आलेला आहे.

यामध्ये उत्तर महारष्टाभर जवळ पाच लाख  सभासदाना  मतदान वंचित ठेवण्याकरिता कुटील कारस्थान करत आहे. उत्तर महारष्टामधील सभासद आर्थिक खर्च करून मुंबई, पुणे, कोल्हापूर यथे जणार नाही हे माहिती असून आपल्या निवडीचा मार्ग सोपा करण्याचा केविलवाणी प्रयत्न करीत आहे. असा आरोप करण्यात येत आहे.   यापुढे ही काही चित्रपट महामंडळातील सदस्य नाशिकसह इतर सर्व कार्यालय बंद करतील. याचा  नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर यथील  सह सर्व  सभासदानी जाहीर निषेध व्यक्त करून वेळीच जागे व्हा. असे अवाहन  पत्रकार परिषदेत नाशिक विभागिय समिती प्रमुख सुनील ढगे, श्याम लोंढे, समिती सदस्य रमेश तलवारे, रवी जन्नावर, रवी साळवे, धनाजी धुमाळ, उमेश गायकवड, अमित कुलकर्णी, विश्वास ठाकूर, अंबादास खैरे, मिलिंद तारे, रफिक सय्यद राजू फिरके , रवी बारटक्के, डॉ. अविनाश धर्मधिकारी .  असंख्य उत्तर महाराष्ट्रातील सभासदांनी केले.

धर्मदाय आयुक्त कार्यालयाचे आदेश

चित्रपट महामंडळ निवडणूक वादांमध्ये धर्मादाय आयुक्त कार्यालयाने आदेश दिले आहेत. धर्मादाय उपायुक्त प्रदीप चौधरी यांनी निवडणूक कार्यक्रम सात दिवसात जाहीर करावा असा आदेश दिला आहे.तर निवडणूक  निर्णय अधिकारी म्हणून  आसिफ शेख, निरीक्षक धर्मदाय आयुक्त कार्यालय  यांची नियुक्ती तर निवडणूक नियंत्रक  अधिकारी म्हणून  शिवराज बंडोपंत नाईकवाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

1 hour ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

1 hour ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

1 hour ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

1 hour ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

1 hour ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

2 hours ago