पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास संथ गतीने सुरू असला तरी ते दोन – तीन दिवसांत केरळमध्ये दाखल होतील , असा अंदाज हवामान विभागाने कायम ठेवला आहे . मोसमी वाऱ्यांच्या प्रवासाच्या या काळामध्ये सोमवारपासून राज्यातील काही भागांत मेघगर्जना अणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे .
हेही वाचा : दिलासादायक:कोकण, मराठवाड्यात आनंदघन बसणार
मोसमी वाऱ्यांनी दक्षिण अरबी समुद्रात गेल्या दोन दिवसांपासून आगेकूच केली . या वाऱ्यांनी दक्षिण अरबी समुद्राचा बहुतांश भाग व्यापला असून , लक्षद्वीपपर्यंत मजल मारली आहे . श्रीलंकेचा अर्धा भाग व्यापून ते भारतभूमीच्या जवळ पोहोचले आहेत . मात्र , शनिवारी ( २८ मे ) मोसमी वाऱ्यांनी कोणतीही प्रगती केली नाही .
हेही वाचा : आज मान्सून अंदमानात दाखल
बंगालच्या उपसागरात दोन दिवसांपासून त्यांची प्रगती थांबली आहे . या वाऱ्यांच्या प्रवासासाठी पोषक वातावरण असून , ते पुढील काही तासांमध्ये पुन्हा प्रगती करतील आणि दोन – तीन दिवसांत केरळमधून भारतात प्रवेशतील , असा अंदाज हवामान विभागाने कायम ठेवला आहे .
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…