मुंबई : माजी मंत्री अनिल देशमुख आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची दिवाळी तुरुंगातच जाणार आहे. दोघांच्याही जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. देशमुख यांचा जामीन सीबीआय कोर्टाने फेटाळून लावला तर राऊत यांच्या जामीनावरील सुनावणी आता 2 नोव्हेंबरला ठेवण्यात आली आहे.
गोरेगाव येथील कथित पत्रा चाळ जमीन गैरव्यवहारप्रकरणी ईडीने 31 जुलै रोजी संजय राऊत यांना अटक केली होती. त्यानंतर संजय राऊतांनी जामीन मिळावा यासाठी, न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर आज (21 ऑक्टोंबर) सुनावणी पार पडली. मात्र, न्यायालयाने 2 नोव्हेंबरला सुनावणी ठेवली आहे. त्यामुळे संजय राऊतांना आजही दिलासा मिळाला नाही. तर कथित 100 कोटी वसुली प्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अनिल देशमुखयांना काही दिवसांपूर्वीच ईडीच्या गुन्ह्यांमध्ये जामीन मिळाला होता. मात्र, सीबीआयकडून त्यांची चौकशी सुरू होती. मात्र, आज सीबीआय कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे त्यांची दिवाळी यंदाही तुरुंगातच जाणार आहे.
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…