वर्षभरानंतरही छाटणी नाही; मनपाचे दुर्लक्ष
सिडको : प्रतिनिधी
सातपूर परिसरातील पपया नर्सरी ते जाधव संकुल मार्गावरील दुभाजकांमध्ये वाढलेल्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्याची मागणी वर्षभरापासून प्रलंबित आहे. लेखी तक्रार करूनही नाशिक महापालिकेच्या उद्यान विभागाने कोणतीही कारवाई न केल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, नागरिकांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे.
पपया नर्सरी ते जाधव संकुलकडे जाणार्या रस्त्याच्या दुभाजकांमधील झाडांच्या फांद्या मोठ्या प्रमाणात वाढून रस्त्यावर पसरल्या आहेत. त्यामुळे वळणावरून येणारी वाहने वेळेत दिसत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी वर्षभरापूर्वी तक्रार करण्यात आली होती. मात्र, अद्यापही फांद्यांची छाटणी न झाल्याने नागरिकांनी महापालिकेच्या उद्यान विभागाच्या निष्काळजीपणावर टीका
केली आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, वाढलेल्या फांद्यांमुळे अनेक किरकोळ अपघात घडले आहेत. रात्रीच्या वेळी औद्योगिक वसाहतीतून ये-जा करणारे अवजड कंटेनर या फांद्यांना घासून जात असल्याने मोठा आवाज होतो. तसेच वाहनांचे नुकसान होण्याचाही धोका निर्माण
झाला आहे.
यासंदर्भात 27 ऑगस्ट 2025 रोजी सातपूर विभागीय कार्यालयात लेखी निवेदन देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही उद्यान विभागाने कोणतीही कार्यवाही न केल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
नागरिकांनी तातडीने फांद्यांची छाटणी करून संभाव्य अपघात टाळावेत, अशी मागणी केली आहे. अन्यथा भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी महापालिका प्रशासनावर राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
Risk of accidents due to overgrown tree branches.
- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…
- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…
ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…
आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…
पंचवीस वर्षांपासून शेतकर्यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…