काजी सांगवी : वार्ताहर
केंद्र सरकारने केलेल्या कांदा निर्यात बंदीच्या विरोधात शेतकरी संतप्त झाला आहे शेतकऱ्याच्या भावना लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत चांदवड येथे आज सकाळी रास्ता रोको सुरू झाला आहे.
आज चांदवड येथिल मुबंई आग्रा महामार्गावर रास्ता रोको करत आहे चांदवड तसेच राज्यातील शेतकरी आधीच अवकाळी आणि दुष्काळने कंबरडे मोडले आहे अश्यातच केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केली म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे . त्यामुळे शरद पवार यांच्या उपस्थितीत रास्ता रोको करण्यात येत आहे, या आंदोलनात राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, गोकुळ पिंगळे ,शहराध्यक्ष गजानन शेलार ,श्रीराम शेटे ,माजी आमदार उत्तम बाबा भालेराव,, माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल ,शिवसेना जिल्हाध्यक्ष नितीन आहेर, तालुका अध्यक्ष विलास भवर, काँग्रेस तालुकाध्यक्ष संजय जाधव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सयाजीराव गायकवाड, नवनाथ आहेर ,शैलेश ठाकरे ,अनिल पाटील,दत्ता वाकचौरे, प्रकाश शेळके ,तुकाराम सोनवणे, रिजवान घाशी ,समाधान जामदार, कारभारी आहेर, नरेंद्र ठाकरे, तुषार शेवाळे, येवल्याचे माणिकराव शिंदे आदी सह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
‘वर्षामागूनी वर्ष सरती ऋतू मागूनी ऋतू’ या गाण्याच्या ओळीप्रमाणे ऋतू चक्र फिरत असते. महिने, वर्ष…
अनेकांना वाटतं की, पेट्रोल-डिझेल महागलं की फक्त स्वतःची गाडी असणार्यांनाच फटका बसतो. पण हे अर्थशास्त्र…
बालपण म्हणजे जणू सुंदर स्वप्न. जे जगताना कधी कळत नाही, पण नंतर आठवलं की डोळे…
पोलिसांचा कानाडोळा; वाहतूक कोंडीत भर नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी मोहीम शहर…
109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…
1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…