सिकलसेल मुक्तीसाठी उद्यापासून विशेष अभियान

आरोग्य कर्मचारी घरोघरी करणार तपासणी

सिन्नर : प्रतिनिधी
राष्ट्रीय सिकलसेल अ‍ॅनिमिया निर्मूलन मिशनअंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाने सिकलसेल मुक्तीसाठी कंबर कसली आहे. राज्यातील सिकलसेलचा प्रादुर्भाव असलेल्या 21 जिल्ह्यांमध्ये 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026 या कालावधीत ‘सिकलसेल अ‍ॅनिमिया विशेष अभियान’ राबवले जाणार आहे.

असे आहेत अभियानाचे टप्पे

पहिला टप्पा (15 ते 20 जानेवारी)- जुन्या सिकलसेल रुग्णांची तसेच अद्याप एकदाही तपासणी न झालेल्या व्यक्तींची यादी तयार केली जाणार आहे. दुसरा टप्पा (21 ते 26 जानेवारी) -ज्यांची सोल्यूबिलिटी टेस्ट झालेली नाही, अशा 0 ते 40 वयोगटातील व्यक्तींची प्रत्यक्ष तपासणी केली जाणार आहे. तिसरा टप्पा (27 जानेवारी ते 7 फेब्रुवारी)-ज्यांची प्राथमिक चाचणी झाली असून, इलेक्ट्रोफोरेसिस तपासणी प्रलंबित आहे, अशांची अंतिम तपासणी केली जाणार आहे.

या मोहिमेत सिन्नर तालुक्यातील प्रत्येक गावात आरोग्य कर्मचारी थेट नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचून तपासणी व जनजागृती करणार आहेत. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे अभियान तीन टप्प्यांत राबवले जाणार असून, आशा स्वयंसेविका, आरोग्य सेवक व सेविकांच्या माध्यमातून सर्वेक्षण पूर्ण केले जाणार आहे. संशयित रुग्णांचा शोध युद्धपातळीवर घेतला जाणार असून, 0 ते 40 वयोगटातील नागरिकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान केवळ तपासणीच नव्हे, तर सिकलसेल बाधित रुग्णांना ‘हायड्राक्सीयुरिया’ गोळ्यांचा मोफत पुरवठा तसेच आवश्यकतेनुसार मोफत रक्तपुरवठादेखील करण्यात येणार आहे. आरोग्य प्रशासनाने नागरिकांनी या अभियानात सहकार्य करून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन केले आहे.

Special campaign for sickle cell eradication from tomorrow

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

अधिक मासातील अधिक विचार

‘वर्षामागूनी वर्ष सरती ऋतू मागूनी ऋतू’ या गाण्याच्या ओळीप्रमाणे ऋतू चक्र फिरत असते. महिने, वर्ष…

23 minutes ago

मरण स्वस्त आणि जगणं महाग

अनेकांना वाटतं की, पेट्रोल-डिझेल महागलं की फक्त स्वतःची गाडी असणार्‍यांनाच फटका बसतो. पण हे अर्थशास्त्र…

42 minutes ago

खरंच!.. काय होते ते दिवस….

बालपण म्हणजे जणू सुंदर स्वप्न. जे जगताना कधी कळत नाही, पण नंतर आठवलं की डोळे…

49 minutes ago

कायद्याच्या बालेकिल्ल्यात रिक्षाचालकांची मुजोरी

पोलिसांचा कानाडोळा; वाहतूक कोंडीत भर नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी मोहीम शहर…

58 minutes ago

जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र

109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…

1 hour ago

अवकाळीचा नाशिक विभागाला सर्वाधिक फटका

1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…

1 hour ago