बसस्थानकावर पोलिसांचा वचक नसल्याने संताप
त्र्यंबकेश्वर : वार्ताहर
त्र्यंबकेश्वर येथे एकादशीच्या वारीसाठी येणार्या महिला भाविकांना लक्ष्य करत त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. 9 ऑगस्ट रोजी एसटी बसमध्ये चढताना झालेल्या गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी दोन महिलांचे लाखो रुपयांचे मंगळसूत्र लांबवल्याच्या घटना
घडल्या आहेत.
एकाच दिवशी दोघींची लूटमार
पहिली घटना : नाशिक येथील नंदा बाळासाहेब शिंदे (वय 52) बसमध्ये चढत असताना चोरट्याने त्यांच्या गळ्यातील 21 ग्रॅमची सोन्याची शॉर्ट पोत
साखळी लांबवली.
दुसरी घटना : निफाड तालुक्यातील ओझरमिग येथील बबिता मनोहर कर्पे (वय 54) या सीएनजी बसमध्ये चढत असताना त्यांच्या गळ्यातील 16 ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी चोरट्यांनी लांबवली. याप्रकरणी त्र्यंबक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दोन महिन्यांत 10 घटना!
1 जून ते 10 ऑगस्टदरम्यान सोनसाखळी चोरीच्या तब्बल 10 फिर्यादी नोंदवल्या गेल्या आहेत.
दुर्लक्ष अन् स्थानिकांचे प्रश्न
त्र्यंबकेश्वर बसस्थानकावर राज्य परिवहन महामंडळाने अद्याप आवश्यक सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले नाहीत. कुशावर्त कुंडावर स्नानासाठी आलेल्या भाविकांचे कपडे आणि पाकिटे घेऊन पळून जाणारे चोरटेही वर्षभर सक्रिय असतात. वारंवार घटना घडूनही पोलीस यंत्रणेकडून कडक पावले उचलली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सोन्याचे भाव गगनाला भिडले असताना महिलांनी कष्टाने घेतलेले दागिने चोरीला गेल्याने त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पोलिसांनी तत्काळ विशेष मोहीम हाती घेऊन मंदिर परिसर, कुशावर्त कुंड आणि बसस्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून सराईत चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी होत आहे.
Spree of Mangalsutra thefts targeting women continues in Trimbakeshwar.
- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…
- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…
ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…
आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…
पंचवीस वर्षांपासून शेतकर्यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…