मुंबई :
सत्ता येते .. सत्ता जाते .. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेले नाही . उद्धव ठाकरे तुम्ही पण नाही . राज्य सरकारला माझे सांगणे आहे . आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका , अशा शब्दांत खरमरीत पत्र राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे . राज ठाकरेंनी भोंग्यांच्या प्रश्नी मनसे कार्यकर्त्यांच्या होणाऱ्या धरपकडीवर आक्रमक भूमिका घेतली आहे . आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका , असा इशारा देखील राज ठाकरेंनी यावेळी दिला आहे .
भोंगे उतरवा ‘ आंदोलनावरून गेला आठवडाभर महाराष्ट्र सैनिकांचीदडपणूक करण्यासाठी राज्य सरकार ज्या पद्धतीने पोलीस बळाचा वापर करत आहे ते पाहता मला प्रश्न पडलाय की , मशिदीमध्ये लपवून ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी अशी धरपकड मोहीम राज्य सरकारने किंवा पोलिसांनी कधी राबवली होती का ?, असा सवाल राज ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला.राज ठाकरे आपल्या पत्रात म्हणाले , महाराष्ट्र राज्य सरकार बेभान होऊन अंगात आल्यासारखं वागत आहे . आमचा संदीप देशपांडे आणि इतरही अनेक कार्यकर्त्यांना पोलीस असे काही शोधत आहेत . जणू ते पाकिस्तानातून आलेले अतिरेकी किंवा निजामाच्या हैदराबाद संस्थानातले रझाकार आहेत ! अर्थात , महाराष्ट्र सैनिकांविरोधात ही अत्याचारी , दमनकारी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना कुणी दिलेत हे समस्त मराठीजन , तमाम हिंदूजन उघड्या डोळ्यांनी बघत आहेत . तब्बल २८ हजार महाराष्ट्र सैनिकांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या हजारोंना तडीपार केलं आणि अनेकांना तुरुंगात डांबलं . राज्य सरकारला माझे एकच सांगणं आहे . आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका . सत्ता येत जात असते . कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही . उद्धव ठाकरे , तुम्हीही नाही !
ओबीसी उपसमितीच्या बैठकीत निर्णय, 43 नव्या जातींच्या समावेशाचा प्रस्ताव मुंबई : राज्यातील ओबीसी समुदायासाठी एक…
नीट पेपरफुटी प्रकरण; सीबीआयकडून झाडाझडती मुंबई : नीट पेपरफुटीचा कट शिवराज मोटेगावकरने त्याच्या साथीदारांना हाताशी…
पश्चिम बंगाल निवडणुकांच्या काळात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशाच्या आर्थिक स्थितीविषयी चिंता व्यक्त केली…
माय मराठीच्या अहिराणी, मावची, भिली, लेवा पाटीदार, कातोडी, सामवेदी, माडिया, गोंडी, पावरा, देहवाली, कोरकू, आंध,…
गेल्या आठवड्यात नातेवाइकाच्या लग्नाला गेलो होतो. खरेतर लग्न कसले, फक्त वैताग. जावे लागते म्हणून लोक…
सवलत पाससाठी जादा पैसे उकळल्याचा ज्येष्ठ नागरिकाचा आरोप मनमाड : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या…