मनोरंजन

ट्रॅजेडी क्वीन ” मीनाकुमारी “..

३१ मार्च …
याच दिवशी ५० वर्षांपूर्वी या अभिनेत्रीने आपला अखेरचा श्वास घेत या जगाचा निरोप मुंबई येथे सेंट एलिझाबेथ हॉस्पिटल मध्ये घेतला . ते साल होते १९७२ . उणेपुरे ३९ वर्षाचे आयुष्य या अभिनेत्रीला लाभले .तिचा जन्म १ ऑगस्ट १९३३ रोजी मुंबई येथे झाला अभिनय, गायक व कवी अशा विविध क्षेत्रात तिचे कमाली चे प्रभुत्व होते. ” नाझ ” या टोपण नावाने तिला ओळखले जाते. तिला भारतीय सिनेमाचे ” सिंड्रेला ” असेही म्हटले जाते. तिचे खरे नाव होते महजबी बानो. तिच्या जन्माच्या वेळी तिचे वडील अलिबख्श व आई इकबाल बेगम यांचे कडे डॉक्टरांना देण्यासाठी पैसे सुद्धा नव्हते. अशा गरीब परिस्थितीत मीनाकुमारी चे बालपण गेले.

वयाच्या सहाव्या वर्षीच तिने सिनेमा सृष्टीत प्रदार्पण केले . अनेक शोकाकुल व शोकात्मक अशा भूमिकेमुळे तिला ” ट्रॅजेडी क्वीन ” असेही म्हटले जाते . एकूण ३३ वर्षे तिने सिनेमा सृष्टीवर अधिराज्य गाजविले . कमल अमरोही बरोबर तिचे वैवाहिक आयुष्य जेमतेम १० वर्ष एवढेच होते . मीनाकुमारीने एकूण ९४ सिनेमा मध्ये अभिनेत्री म्हणून काम केले .या पैकी साहेब बीबी और गुलाम, पाकिझा , आरती, बैजू बावरा , प्रणिता, दिल आपण और प्रीत पराई फूट पाथ . काजल इत्यादी सिनेमांचा समावेश होतो .बैजू बावरा या १९५२ साली रिलीज झालेल्या चित्रपटाने मीनाकुमारीची प्रसिद्धी साऱ्या भारतभर झाली . तसेच पाकिझा या १९७२ साली रिलीज झालेल्या सिनेमाने तिला तिच्या मृत्यू नंतर प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली . चित्रपट क्षेत्रातील एक सौंदर्यवती अभिनेत्री मधुबाला ही मीनाकुमारीची अतिशय आवडती होती . सिनेक्षेत्रातील एका अग्रगण्य सिने दिग्दर्शक सत्यजित रे यांनी मीनाकुमारी बद्दल अतिशय गौरवोद्गार काढले आहेत . त्यांच्या मते मीनाकुमारीची अभिनयातील क्षमता उच्च कोटीची होती . गुलझार सारखा कवी म्हणतो ” मीनाकुमारी म्हणजे साक्षात कविताच होती.”

मीनाकुमारी एवढा लोकप्रिय कलाकार होणे दुर्मिळ आहे . कमल अमरोही बरोबर तिचा १९६४ साली घटस्फोट झाला . मीनाकुमारी अखेरीस निराशेच्या खाईत गेली . या निराशेपोटी डॉक्टरांनी तिला ब्रँडीचा डोस औषध म्हणून देण्यास सुरवात केली . त्याचे तिला व्यसनच लागले . तिला शेवटी लिव्हर सिरासीस झाला त्यातच तिने ३१ मार्च १९७२ रोजी या जगाचा निरोप घेतला . जिवंत पणीच आख्यायिका बनलेल्या मीनाकुमारीच्या आयुष्याची अद्भुत कहाणी पुढे लोक वाचताच राहतील मीनाकुमारी आयुषयभर खरे प्रेम शोधत राहिली पण त्याचा शोध मात्र तिच्या मृत्यू नंतरचा थांबला . मीनाकुमारीला एकूण १९५४, १९५५ १९६३ व १९६६ अशा चार वर्षे फिल्मफेअर अवार्ड मिळाले होते . भारत सरकारने या अभिनेत्रींच्या स्मरणार्थ २०११ साली पोस्टाचे तिकीट काढले होते मीना कुमारने आपल्या कबरीवर खाली ल शब्द लिहण्याची विनंती केली होती.

 

” वो अपनी जिंदगी को
एक अधुरे साज
एक अधुरे गीत … एक तुटे दिल
परंतु बिना किसी अफसोस
के साथ समाप्त हो गयी “

==
शांताराम वाघ पुणे

Team Gavkari

Recent Posts

अर्ध्यावरचा डाव

- अ‍ॅड. प्रतीक्षा चौधरी पावसाळ्याची सकाळ होती. सगळीकडे चिंब असं वातावरण झालेलं होतं. आज आमच्या…

16 hours ago

प्रेम म्हणजे आयुष्य… की आयुष्याचा एक भाग

- अमोल जगताप नाशिकमध्ये नुकतीच घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण समाजाला अंतर्मुख करून गेली. प्रेमसंबंधातून…

16 hours ago

‘जेन झी’ला आधी समजून घ्या!

- प्रा. योगेश हांडगे आजच्या घरात, महाविद्यालयात, कार्यालयात किंवा समाजात एक पिढी सतत चर्चेत आहे-जेन…

17 hours ago

तांबटी तलावाला दीड कोटीतून नवसंजीवनी

आमदार डॉ. राहुल आहेरांंच्या पाठपुराव्याला यश; लोकार्पण, जलपूजन चांदवड : वार्ताहर तालुक्यातील वडबारे येथील तांबटी…

17 hours ago

पेपरफुटीमुक्त परीक्षा : विधेयकापासून विश्वासार्ह व्यवस्थेकडे

परीक्षा म्हणजे केवळ गुणांची स्पर्धा नसते; ती विद्यार्थ्यांच्या मेहनतीची, प्रामाणिकतेची आणि भविष्यातील संधींची खरी कसोटी…

17 hours ago

तांत्रिक चूक

फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सची कंपनी असलेल्या मेटा कंपनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…

17 hours ago