सिडको : प्रतिनिधी
रिक्षातून प्रवास करताना महिलेच्या बॅगेत ठेवलेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि बँकेची कागदपत्रे असा एकूण 2 लाख 86 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना नांदूर नाका परिसरात घडली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अलका गोरख पाटील (वय 69, रा. संस्कृती अपार्टमेंट, जयभवानी रोड, नाशिक) या काही दिवस मुलाकडे राहण्यासाठी कन्नड येथून नाशिकला येत होत्या. 7 ऑगस्ट रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास त्या वैजापूर येथून नाशिककडे येण्यासाठी एसटी बसने निघाल्या. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्या औरंगाबाद नाका येथे उतरल्या.
तेथून बिटकोकडे जाण्यासाठी त्यांनी रिक्षा पकडली. रिक्षात आधीच एक महिला आणि दोन पुरुष प्रवासी बसले होते. पाटील रिक्षात बसल्यानंतर चालकाने त्यांची बॅग रिक्षाच्या मागील बाजूस ठेवली. नांदूर नाका येथे सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास त्या
रिक्षातून उतरल्या.
घरी पोहोचल्यानंतर त्यांनी बॅग तपासली असता त्यातील सोन्याचे दागिने, 70 हजार रुपयांची रोख रक्कम तसेच बँकेची कागदपत्रे गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरी झालेल्या ऐवजात सोन्याची पोत, कानातील दागिने आणि तीन सोन्याच्या अंगठ्यांसह चांदीच्या साखळ्या, रोख रक्कम, बँक पासबुक व मुदत ठेवीची कागदपत्रे यांचा समावेश आहे. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
Travel by rickshaw; valuables worth ₹2.86 lakh stolen from woman’s bag.
- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…
- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…
ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…
आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…
पंचवीस वर्षांपासून शेतकर्यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…