प्रतिमा

वटपौर्णिमा

परंपरेतून पर्यावरणापर्यंत नेणारा सांस्कृतिक वारसा

प्रार्थनेची शक्ती आपल्या मनातील आकांक्षा दात्यापर्यंत पोहोचवते. भारतीय संस्कृतीत सणावारांना विशेष महत्त्व आहे. कारण त्यातून प्रत्येक नातेसंबंधाला बांधून ठेवण्याची ताकद निर्माण होते. प्रत्येक सणामागे काहीतरी उद्देश असतो, जो कळत नकळत साध्य होतो.
व्रतवैकल्ये स्त्रीजीवनाशी निगडित असून, ती अगदी बालवयापासून ते विवाहापर्यंत प्रत्येक नात्यामध्ये उतराई होताना दिसतात. विवाहानंतर मात्र, तिच्या हळव्या आणि लाघवी मनाची एकच आकांक्षा असते ती म्हणजे, तिचे सौभाग्य. जन्मोजन्मी सौभाग्याचे दान मिळावे, जन्मोजन्मी तुझ्या ऋणानुबंधात मी राहावे. शिव-पार्वतीपासून ते आजही पती-पत्नीच्या नात्यात एक अतूट, पवित्र बंधन आहे. विवाह हे फक्त बंधन नाही, तो एक बंध आहे.
काही हजारो वर्षांपूर्वी सावित्रीने आपल्या पतीचे, म्हणजेच सत्यवानाचे प्राण वटवृक्षाच्या छायेत वाचवले, असे आपण ऐकत आलो आहोत. याचा ऊहापोह न करता, यातून आपल्या प्रिय व्यक्तीवरील आस्था आणि प्रार्थनेची ताकद समजते. ती एक हृदयस्पर्शी शक्ती आहे. तुम्हारी प्रार्थना फूल की गंध की तरह होनी चाहिए.- ओशो.
आज आपल्यावर सत्यवान आणि सावित्रीसारखी वेळ येणार नाही. कारण तितके अरण्य आणि एकांत हे फक्त नावापुरते उरले आहे. त्याची जागा आता झगमगाट जीवनशैली आणि दिखाव्याने घेतली आहे. असो. याच आख्यायिकेचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास केला तर, आजच्या सावित्रीच्या लेकी म्हणून आपलेही उत्तरदायित्व महत्त्वाचे आहे. ते या अर्थाने की, सर्वाधिक ऑक्सिजनचा पुरवठा करणार्‍या विविध झाडांचे वृक्षारोपण आणि त्यांचे संरक्षण म्हणजे आजच्या आपल्या प्रत्येकाच्या श्वासाचे रक्षण म्हणता येईल.

सुनीता सानप-सांगळे

Editorial Team

Recent Posts

अधिक मासातील अधिक विचार

‘वर्षामागूनी वर्ष सरती ऋतू मागूनी ऋतू’ या गाण्याच्या ओळीप्रमाणे ऋतू चक्र फिरत असते. महिने, वर्ष…

15 minutes ago

मरण स्वस्त आणि जगणं महाग

अनेकांना वाटतं की, पेट्रोल-डिझेल महागलं की फक्त स्वतःची गाडी असणार्‍यांनाच फटका बसतो. पण हे अर्थशास्त्र…

34 minutes ago

खरंच!.. काय होते ते दिवस….

बालपण म्हणजे जणू सुंदर स्वप्न. जे जगताना कधी कळत नाही, पण नंतर आठवलं की डोळे…

40 minutes ago

कायद्याच्या बालेकिल्ल्यात रिक्षाचालकांची मुजोरी

पोलिसांचा कानाडोळा; वाहतूक कोंडीत भर नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी मोहीम शहर…

50 minutes ago

जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र

109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…

58 minutes ago

अवकाळीचा नाशिक विभागाला सर्वाधिक फटका

1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…

1 hour ago