सिडको : प्रतिनिधी
श्रावण महिन्यात कपालेश्वर मंदिर आणि रामकुंड परिसरात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमनासाठी विशेष व्यवस्था केली आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवार आणि शनिवार या दिवशी सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत कपालेश्वर मंदिर, रामकुंड व गंगाघाट परिसरातील काही मार्गांवर अत्यावश्यक सेवेची वाहने वगळता सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
श्रावण महिन्यानिमित्त नाशिक शहरासह जिल्ह्यातील विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने कपालेश्वर मंदिरात दर्शनासाठी आणि रामकुंड येथे स्नानासाठी येतात. त्यामुळे भाविक व वाहनांची मोठी गर्दी होऊन वाहतूक कोंडी तसेच अपघाताची शक्यता निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. श्रावणातील सोमवार आणि शनिवार या दिवशी वरील मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी राहणार आहे. मात्र, पोलिस सेवेतील वाहने, रुग्णवाहिका, शववाहिका आणि अग्निशमन दलाची वाहने या निर्बंधांतून वगळण्यात
आली आहेत.
वाहतूक अधिसूचनेनुसार आवश्यकतेनुसार निर्बंधाच्या वेळेत किंवा व्यवस्थेत बदल करण्याचे अधिकार वाहतूक पोलिसांनी राखून ठेवले आहेत. भाविक आणि वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन पोलिस उपआयुक्त (मुख्यालय/वाहतूक) चंद्रकांत गवळी यांनी जारी केले आहेत.
या मार्गांवर वाहनांना प्रवेश बंद राहणार
श्रावणातील प्रत्येक सोमवार आणि शनिवारी सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत मार्गांवर वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. मालेगाव स्टॅण्डकडून श्री कपालेश्वर मंदिरकडे (रामकुंड) येणारा मार्ग. खांदवे सभागृहाकडून श्री कपालेश्वर मंदिरकडे (रामकुंड) येणारा मार्ग. सरदार चौकाकडून श्री कपालेश्वर मंदिर (रामकुंड)कडे येणारा मार्ग. ढिकले वाचनालयाकडून श्री कपालेश्वर मंदिर(रामकुंड)कडे येणारा मार्ग.
Vehicular entry banned in the Ramkund area on Shravani Mondays and Saturdays.
- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…
- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…
ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…
आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…
पंचवीस वर्षांपासून शेतकर्यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…