नाशिक:प्रतिनिधी
जाखोरी गावाजवळील चांदगिरी येथे घरासमोर असलेल्या कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या एका आठ वर्षाच्या बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कार्तिक शिवाजी शेलार (वय ८) चांदगिरी हा मुलगा घराजवळ असताना जवळच असलेल्या कडवा कालव्यामध्ये पोहण्यासाठी गेला होता. परंतु, पाणी जास्त असल्याने सदर बालकाला अंदाज न आल्यामुळे त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.दरम्यान, गावकरी ना समजताच त्यांनी तातडीने त्याला बाहेर काढले व उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. या घटनेप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…