तिन्ही कालव्यांना आवर्तन; आठ तालुक्यांना दिलासा
करंजी खुर्द : प्रतिनिधी
गेल्या पंधरा दिवसांच्या उघडिपीनंतर जिल्ह्यात पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. यामुळे गंगापूर, दारणा, भावली व पालखेड या धरणांमधून पाणी सोडण्यात येत असून, नांदूरमध्यमेश्वर धरणात पाण्याची आवक वाढली आहे. बुधवारी (दि. 22) या धरणातून गोदावरी नदीपात्रात 4,760 क्यूसेकने, तर तीन कालव्यांद्वारे 1,550 क्यूसेक असा एकूण 6,310 क्यूसेक विसर्ग सुरू होता.
धरणाचे दोन वक्र दरवाजे एक मीटरने उचलून हे पाणी जायकवाडी धरणाच्या दिशेने सोडण्यात आले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग वाढवला जाईल, अशी माहिती कनिष्ठ अभियंता नितीन मुठाळ यांनी दिली. या पाण्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गतवर्षी या धरणातून जायकवाडीच्या दिशेने तब्बल 105.20 टीएमसी पाणी सोडण्यात आले होते.
धरणात आवक वाढल्याने डावा, उजवा व एक्स्प्रेस या तिन्ही कालव्यांना खरिपाचे पहिले आवर्तन सुरू करण्यात आले आहे. या आवर्तनाचा फायदा नाशिक, अहिल्यानगर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील शेतीला होणार आहे.
निफाड तालुक्यात 94.29 टक्के पेरण्या पूर्ण
जून महिन्यात पावसाने हुलकावणी दिल्याने खरिपाच्या पेरण्या लांबल्या होत्या. मात्र, जुलैच्या सुरुवातीला झालेल्या समाधानकारक पावसामुळे 15 जुलैपर्यंत 80.5 टक्के पेरण्या झाल्या होत्या. त्यानंतर पावसाची संततधार कायम राहिल्याने 22 जुलैपर्यंत तालुक्यात 94.29 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून, शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.
4,760 cusecs of water discharged from Nandur Madhyameshwar
- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…
- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…
ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…
आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…
पंचवीस वर्षांपासून शेतकर्यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…