हिसवळ जवळ ट्रकने चिरडल्या 50 मेंढ्या

हिसवळ जवळ ट्रकने चिरडल्या 50 मेंढ्या

मनमाड : प्रतिनिधी

-मनमाड नांदगाव महामार्गावर मनमाड नजीक असलेल्या हिसवळ जवळ एका ट्रक चालकाने जवळपास 45 ते 50 मेंढ्या चिरडल्या व तेथून गाडी घेऊन धूम ठोकली स्थानिक नागरिकांनी तात्काळ मनमाड पोलीस ठाण्यात फोन केला पोलीस व स्थानिक नागरिकांनी मनमाड चौफुली येथे ट्रक पकडला व त्याला पोलीस ठाण्यात घेऊन गेले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की मनमाड नांदगाव महामार्गावर हिसवळ येथे मेंढपाळाच्या जवळपास 45 ते 50 मेंढ्या एका ट्रकने चिरडल्या व तेथुन धूम ठोकली स्थानीक नागरिक दत्तू पवार व इतर नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व ट्रकचालकांबाबत मनमाड पोलीस ठाण्यात माहिती दिली काही तरुण ट्रक मागे पाठलाग करत आले व मनमाड पोलिसांनी देखील तात्काळ दखल घेऊन मालेगाव चौफुली येथे ट्रक पकडला.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असुन गरीब मेंढपाळला न्याय मिळून द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.

 

मेंढपाळ परिवाराला नुकसान भरपाई मिळावी..?

सध्या राज्याच्या वेगवेगळ्या भागात हिट अँड रनच्या घटना मध्ये वाढ झाली असून आज अशीच घटना मनमाड-नांदगावं मार्गांवर हिसवळ जवळ घडली असून भरधावं वेगाने जाणाऱ्या ट्रक तब्बल 30 ते 35 मेंढया चिरडून फरार झाला मात्र परिसरातील नागरिकांनी त्याचा पाठलाग करून त्याला मनमाडच्या चौफुलीवर पकडून पोलिसांच्या हवाली केले.अपघातात मोठया प्रमाणात मेंढया दगावल्यामुळे मेंढपाळाचे मोठे नुकसान झाले असून पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन चालकावर गुन्हा दाखल केला आहे मात्र या मेंढपाळ वर जे संकट ओढवले त्याला यातुन मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले ती भरपाई मिळावी अशी माफक अपेक्षा नागरिकांकडुन करण्यात येत आहे.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

‘पॅड’साठीही लढा

सरकारकडे मासिक पाळी स्वच्छतेसाठी धोरण आहे, योजना आहेत, कागदोपत्री आकडे आहेत. पण या धोरणाची अंमलबजावणी…

6 hours ago

नेपाळचे बदलते राजकारण

नेपाळचे राजकारण गेल्या दोन दशकांपासून अस्थिरतेच्या भोवर्‍यात अडकलेले होते. राजेशाही संपल्यानंतर लोकशाहीची स्थापना झाली असली…

7 hours ago

‘नारी’शक्तीच्या आडून मिशन निवडणूक

पश्चिम बंगाल, तामिळनाडूमधील मतदान तोंडावर आले असतानाच कोणताही संदर्भ नसताना केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात संसदेचे…

7 hours ago

आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा गैरवापर की संधी?

आजच्या डिजिटल युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हे तंत्रज्ञान वेगाने सर्व क्षेत्रांमध्ये प्रवेश करत आहे. शिक्षण…

7 hours ago

कोठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?

रोजचं वर्तमानपत्र वाचलं, वृत्तवाहिन्या पाहिल्या तसेच समाजमाध्यमावर फेरफटका मारला तरी महाराष्ट्राच्या अब्रूचे धिंडवडे निघालेले दिसतील.…

7 hours ago

मजा करणारे, कष्ट करणारे समजून घ्या

संपलेल्या दहा दिवसांत समाजातील दोन प्रकार मी जवळून बघितले. एक प्रकार म्हणजे कोकणातून मजुरीसाठी आलेले,…

7 hours ago