महाराष्ट्र

देवगाव येथे कर्जफेडीच्या विवंचनेतून शेतकऱ्याने संपवलं आयुष्य

देवगाव येथे कर्जफेडीच्या विवंचनेतून शेतकऱ्याने संपवलं आयुष्य

लासलगाव:समीर पठाण

शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करता येत नसल्याच्या विवंचनेतून दत्तात्रय सुखदेव निफाडे (वय ५२) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना निफाड तालुक्यातील देवगाव येथे घडली.

याबाबत मृत दत्तात्रय निफाडे यांचा मुलगा चंद्रकांत निफाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय निफाडे यांची देवगाव शिवारात २ एकर शेती आहे. निफाडे यांनी देवगाव नागरी सहकारी पतसंस्थेकडून ४ लाख १० हजार, कॅनरा बँक निफाड शाखेतून पत्नीच्या नावे २ लाख व मुलाच्या नावे २ लाख रुपये कर्ज घेतले होते. तसेच नातेवाईक व मित्राकडून ४ लाख रुपये हातउसने घेतले होते. शेतात लागवड केलेले टोमॅटो आणि कांदा बाजारपेठेत विकून उत्पादन खर्चही निघाला नाही. त्यामुळे घेतलेले कर्ज फेडायचे कसे? या विचाराने ते काही दिवसापासून तणावात होते. त्यातूनच सोमवार दि.१६ सकाळी ११.३० सुमारास दत्तात्रय निफाडे यांनी शेतातील स्वतःच्या राहत्या घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली.

घटनेची माहिती पोलीस पाटील सुनील बोचरे यांनी लासलगाव पोलीस स्टेशनला कळविली. लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. स.पो.नि.राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लहानु धोक्रट, पोलीस नाईक संदिप शिंदे व औदुंबर मुरडनर अधिक तपास करीत आहे.

Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

अधिक मासातील अधिक विचार

‘वर्षामागूनी वर्ष सरती ऋतू मागूनी ऋतू’ या गाण्याच्या ओळीप्रमाणे ऋतू चक्र फिरत असते. महिने, वर्ष…

24 minutes ago

मरण स्वस्त आणि जगणं महाग

अनेकांना वाटतं की, पेट्रोल-डिझेल महागलं की फक्त स्वतःची गाडी असणार्‍यांनाच फटका बसतो. पण हे अर्थशास्त्र…

43 minutes ago

खरंच!.. काय होते ते दिवस….

बालपण म्हणजे जणू सुंदर स्वप्न. जे जगताना कधी कळत नाही, पण नंतर आठवलं की डोळे…

49 minutes ago

कायद्याच्या बालेकिल्ल्यात रिक्षाचालकांची मुजोरी

पोलिसांचा कानाडोळा; वाहतूक कोंडीत भर नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी मोहीम शहर…

58 minutes ago

जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र

109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…

1 hour ago

अवकाळीचा नाशिक विभागाला सर्वाधिक फटका

1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…

1 hour ago